काय घडलं त्या घरात?
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील उसरणी गावात कैलास किणी (वय ४७) आणि कोमल किणी (वय३८) हे त्यांच्या मुलगी किमया (वय१९) असे एक कुटुंब आनंदाने राहतात. याच गावात यांचे एक किराणा सामानाचे दुकान असून यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यात त्यांना मधुमेहाचा त्रासही असल्याचे समोर आले होते. मात्र मंगळवारी या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला .
advertisement
किणी दाम्पत्यांची मुलगी किमया ही मंगळवारी ठाणे येथे परीक्षेसाठी गेली होती. घरी काही कामानिमित्ताने फोन करत होती पण फोन कोणीही उचलत नसल्याने तिने त्याच गावात राहत असलेल्या काकूला सांगितले मात्र तिला घर बंद असल्याचे दिसून आले. याबाबत तिने पती संदीप यांना सांगितले. काही वेळात संदीप यांनी माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी जाऊन घरचा दरवाजा तोडला असता दोघोही बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
समोर आले धक्कादायक कारण
मिळालेल्या माहितीनुसार. किणी यांचे एक सफाळेत ताडी पट्ट्याचे दुकान होते त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाच डोंगर वाढत होता तसेच देणेकरी, बँक कर्ज रकमेच्या मागणीचा तगादा लावत असल्याने दोघही गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. हा कर्जाचा बोजा सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपले.
