नेमके घडले काय?
ठाणे शहरातील इंदिरा नगर परिसरातही भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना एक धक्कादायक प्रकार घडला. काही तरुणांनी रस्त्यावर फटाके लावून जल्लोष सुरू केला होता. त्याच वेळी त्या रस्त्यावरून एक कार जात होती. फटाके पेटलेले असतानाच ती कार त्याच्या वरुन गेल्याचे दिसून आले.
फटाके फुटत असताना कार पुढे जात होती मात्र सर्व प्रकार घडल्याने कार तिथंच थांबवण्यात आली. मात्र काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांच्या ठिणग्या कारवर पडताना दिसल्या. त्यामुळे आसपास उभ्या असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली.
advertisement
मात्र कार चालकाने घाबरून न जाता शांतपणे गाडी पुढे नेली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि कारचेही मोठे नुकसान झाले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.
