TRENDING:

Vegetable Export Hub: ठाणे जिल्ह्यात उभं राहतंय शेतकऱ्यांसाठी मल्टी मॉडेल हब, होणार लाखो टन शेतमालांची हाताळणी

Last Updated:

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला निर्यातीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये हब उभारण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भिवंडी तालुक्यातील बापगावामध्ये मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. फळे आणि भाजीपाला निर्यातीसाठी शेतकऱ्यांना ठाणे जिल्ह्यात हे हब उभारण्यात येत आहे. त्यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला तब्बल 7 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे दरवर्षी एक लाख टन शेतमालाची हाताळणी करणे शक्य होणार आहे.
Vegetable Export Hub: ठाणे जिल्ह्यात उभं राहतंय शेतकऱ्यांसाठी मल्टी मॉडेल हब, होणार लाखो टन शेतमालांची हाताळणी
Vegetable Export Hub: ठाणे जिल्ह्यात उभं राहतंय शेतकऱ्यांसाठी मल्टी मॉडेल हब, होणार लाखो टन शेतमालांची हाताळणी
advertisement

ज्या ठिकाणी सरकारकडून मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे, त्या जागेवर जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या प्रकल्पाच्या माध्यमातून हब आणि टर्मिनल मार्केटची उभारले जाणार आहे. या बांधणीसाठी सरकारकडून 98 कोटी 66 लाख रूपयांचा निधी मंजूर केला गेला आहे. या प्रकल्पाच्या बैठकीसाठी अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

advertisement

राज्यभरातील शेतकर्‍यांसाठी हब आणि टर्मिनल मार्केटमध्ये सुविधा निर्माण होणार आहेत. या माध्यमातून त्यांच्या शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहेत. शेतमालाची गुणवत्ता सुधारणे, प्रक्रिया करणे सुलभ होणार आहे. या हब आणि टर्मिनल मार्केटमध्ये व्यापारी आणि निर्यातदार यांना एकाच छताखाली आणले जाणार आहे. यातून निर्यात आणि लॉजिस्टिक सेवांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होणार असून निर्यात वाढीमुळे परकीय चलन मिळणार आहे.

advertisement

मार्केटची जमीन राज्य कृषी पणन महामंडळाला मोफत दिली जाणार असून मार्केटमध्ये शेतमालासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. हब आणि टर्मिनल मार्केटमध्ये फळे- भाज्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व्हेपर हीट ट्रीटमेंट, विकिरण प्रकल्प, पॅक हाउस तसेच साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. आंबा, मसाले आणि पशुखाद्य यांसारख्या उत्पादनांवर विकिरणाद्वारे प्रक्रिया करून त्यांची गुणवत्ता टिकवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे एक लाख टन शेतमालाची हाताळणी शक्य होणार आहे. ठाणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून शेतमाल निर्यातीला चालना मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
सर्व पहा

शेतमालाची गुणवत्ता वाढवणे, प्रक्रिया करणे आणि सुरक्षित साठवण करणे अधिक सोपे होणार आहे. या केंद्रात व्यापारी आणि निर्यातदार एकाच ठिकाणी एकत्र येणार आहेत. त्यामुळे निर्यात आणि वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक सर्व सुविधा एका छताखाली मिळणार आहेत. निर्यात वाढल्याने देशाला परकीय चलनही मिळणार आहे. जागतिक बाजारपेठांचा अभ्यास करून हा एकात्मिक प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने काढणीनंतर होणारे नुकसान कमी होईल आणि शेतमालाचा दर्जा सुधारेल. या प्रकल्पातून रोजगारनिर्मिती होणार असून आसपासच्या भागातील व्यवसायांनाही फायदा होईल, असे मत मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Vegetable Export Hub: ठाणे जिल्ह्यात उभं राहतंय शेतकऱ्यांसाठी मल्टी मॉडेल हब, होणार लाखो टन शेतमालांची हाताळणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल