
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३० तास ठप्प झाला होता. आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅसचा टँकर उलटल्याने ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे आबालवृद्धांचे हाल झाले.महत्त्वाचा महामार्ग ठप्प झाल्याने सरकारवर जोरदार टीका सुरू झाली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवर प्रशासकीय अनास्थेवर नाराजी व्यक्त केली आहे.