
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसनं स्वबळावर २७ जागा जिंकल्या होत्या. त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या तीन नगरसेवकांचा देखील पाठिंबा होता. अशात इथं काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या चार नगरसेवकांची गरज होती. पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे.आता ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे गट भाजपला जोरदार विरोध करत असला तर चंद्रपुरात दोन्ही पक्ष एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षाला सव्वा सव्वा वर्षे महापौर पद मिळणार असल्याची माहिती आहे.