अदनान सामी यांची आई बेगम नूरीन यांचं अचानक निधन झालं. त्यांना यापूर्वी कोणतेही गंभीर आरोग्यविषयक त्रास नव्हते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच अदनान यांनी त्वरित भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी संपर्क साधून जाण्याची परवानगी मागितली.
पुतिन यांचा राग नियंत्रणाबाहेर, तयार केले किल झोन; Mission Anaconda सुरू
भारतीय सरकारनं खूप समजूतदारपणे प्रतिसाद दिला, असे त्याने सांगितले. मी भारत सरकारला विचारलं की मी जायचं आहे, तुम्हाला काही आक्षेप आहे का? त्यांनी उत्तर दिलं – तुमच्या आईचे निधन झाले आहे. तुम्हाला नक्कीच जायला हवं. भारत सरकारच्या बाजूने काहीच अडचण नव्हती.
advertisement
मात्र जेव्हा अदनान पाकिस्तानकडे व्हिसासाठी अर्ज केला. तेव्हा प्रतिसादच मिळाला नाही. अखेर व्हिसा नाकारण्यात आला. मी व्हिसासाठी अर्ज केला. पण त्यांनी नकार दिला. मी सांगितलं की माझ्या आईचं निधन झालं आहे. तरीही त्यांनी मला जाऊ दिलं नाही. मी माझ्या आईचा पूर्ण जनाजा व्हॉट्सॲप व्हिडिओवर पाहिला.
इराणने ‘रेडलाईन’ ओलांडली, उचलले अजब पाऊल; जगाला मोठा धोका,अमेरिकेला फाट्यावर...
लंडनमध्ये जन्मलेले अदनान सामी हे पाकिस्तान एअरफोर्सचे वैमानिक आणि राजनैतिक अधिकारी यांचे पुत्र आहेत. 2016 मध्ये त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं. अदनान सामीने याआधीही अनेकदा सांगितलं आहे की पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय वातावरणामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मुलगा पाकिस्तानमध्येच राहतो.
अनेकांनी अदनानचे भारतात स्थलांतर आर्थिक कारणांमुळे झालं असं सांगितलं होतं. पण त्यांनी हे स्पष्टपणे फेटाळलं. मी श्रीमंत कुटुंबात जन्मलो होतो. मी पाकिस्तानमध्ये कोट्यवधींची मालमत्ता सोडली आणि भारतात शून्यातून सुरुवात केली," असं त्याने सांगितलं. एका कलाकाराला प्रेक्षकांची गरज असते. प्रेक्षक हेच कलाकाराचं अन्न आहे. मला पाकिस्तानमध्येही प्रेम मिळालं, पण प्रत्येकालाच प्रगती हवी असते.
‘कभी तो नजर मिलाओ’ या गाजलेल्या गाण्यामुळे अदनान सामीने भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं. आशा भोसले यांच्यासोबतचं हे गाणं आजही लोकांच्या आठवणीत आहे.
