"इराणमधील सध्याच्या गंभीर घडामोडी पाहता, जे भारतीय नागरिक सध्या तिथे आहेत, मग ते विद्यार्थी, पर्यटक, भाविक किंवा व्यावसायिक असोत, त्यांनी उपलब्ध व्यावसायिक विमानांनी किंवा इतर वाहतूक साधनांनी लवकरात लवकर इराण सोडावं, यासोबतच, जे भारतीय नागरिक अद्याप त्या ठिकाणी आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांपासून किंवा गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावं, अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात राहावं", असं आवाहन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.
advertisement
पासपोर्ट, ओळखपत्रं जवळ ठेवा
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, दूतावासाने नागरिकांना त्यांचे पासपोर्ट, ओळखपत्रं आणि इतर महत्त्वाची इमिग्रेशन कागदपत्रं सदैव स्वतःजवळ आणि तयार ठेवण्यास सांगितलं आहे. तसंच, ज्या नागरिकांनी अद्याप दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ अधिकृत लिंकवर (https://www.meaers.com/request/home)
जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. जर इंटरनेटच्या समस्येमुळे इराणमध्ये ही नोंदणी करणे शक्य नसेल, तर भारतातील त्यांच्या कुटुंबियांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
हेल्पलाईन नंबर जारी
आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाने खालील हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल जारी केले आहेत:
कोणत्याही मदतीसाठी भारतीय नागरिक +989128109115, +989128109109, +989128109102 आणि +989932179359 या मोबाईल क्रमांकांवर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.
इराणमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरता आणि हिंसक संघर्ष सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
