ग्रामीण भागात दरमहा भाजीवर 203 रुपये, धान्य खरेदीवर 185 रुपये तर अंडी, मासे, मांस खरेदीवर 185 रुपये खर्च करतात. फळांवर 140 रुपये, खाद्यतेलावर 136 रुपये आणि मसाल्यांवर 113 रुपये तर डाळींवर 76 रुपयांचा खर्च होतो. शहरी भागात सुमारे 246 रुपयांची फळं, 245 रुपयांच्या भाज्या, 235 रुपयांचं धान्य, अंडी, मांस, मासे यांच्यावर 231 रुपये, खाद्यतेलावर 138 रुपये आणि डाळींवर 90 रुपये दर महिन्याला खर्च होतात असं हा सर्व्हे सांगतो.
advertisement
सर्दी-खोकला झालं वाटलं पण निघाला गंभीर आजार, महिलेला कापावे लागले हात-पाय
तज्ज्ञ सांगतात की भारतात दूध हे पूर्णान्न मानलं जातं. त्यामुळे दुधाचा खप वेगाने वाढला आहे. दूधाचा आहारातील समावेश वाढल्यामुळे भारताच्या एकूण आरोग्यमानावर त्याचा चांगला परिणाम दिसतो. दुधातील पोषक घटक आरोग्यासाठी चांगले ठरतात. दूध पिण्यामुळे कुपोषण कमी होण्यास मदत होते. ग्राहक मंत्रालयाच्या एका अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत दुधाच्या किमती 42 रुपये लिटरवरुन 60 रुपये लिटरपर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षभरात दूध सगळ्यात महाग झालं अहे. मात्र तरीही या किंमतींचा दुधाच्या खपावर कुठलाही परिणाम झालेला नाही. देशात दूध सर्वाधिक वापरलं जातं असं नाही तर जागतिक दूध उत्पादनात भारताचं योगदान 24.64 टक्के एवढं आहे.
गेल्या नऊ वर्षांत दूध उत्पादनात सुमारे 58 टक्के वाढ झाली आहे. 2022-23 मध्ये भारताने 230.58 मेट्रिक टन इतकं दुग्धोत्पादन केलं. दूध उत्पादनात राजस्थानचा (15.5 टक्के) पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश (14.93 टक्के), मध्य प्रदेश (8.6 टक्के), गुजरात (7.56 टक्के) आणि आंध्र प्रदेशचा (6.97 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. देशातील एकूण दूध उत्पादनात या पाच राज्यांचं योगदान 53.11 टक्के आहे. विशेष म्हणजे आपला शेजारी देश पाकिस्तानही याबाबतीत आपल्याच सारखा आहे. महागाईने गांजलेल्या पाकिस्तानातील नागरिकही दूधावर सर्वाधिक पैसे खर्च करतो. पाकिस्तानी लोक महिन्याला 168.5 रुपये दुधावर खर्च करतात. फळं आणि भाज्यांवर 68.3 रुपये, अंड्यांवर नऊ रुपये आणि मासे खरेदीवर महिन्याला तीन रुपये खर्च करतात.
