Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतियेला आपल्या हातून या चुका होऊ नयेत; वाईट काळ त्यादिवसापासून सुरू होईल

Last Updated:

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो, तो देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. या दिवशी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अन्यथा देवी लक्ष्मी घराच्या दारात येऊन परत जाते, असे मानले जाते.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो, तो देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. या दिवशी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अन्यथा देवी लक्ष्मी घराच्या दारात येऊन परत जाते, असे मानले जाते. सगळ्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अक्षय तृतीयेला कोणते विशेष नियम लक्षात ठेवले पाहिजेत, त्याबाबत जाणून घेऊया. काय करू नये तेही जाणून घेऊ.
अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही हे काम करू नये -
या गोष्टी करू नका - अक्षय तृतीयेच्या दिवशी चोरी, खोटे बोलणे किंवा जुगार खेळणे इत्यादी कोणतेही चुकीचे काम करू नका. या गोष्टी केल्याने घरातून आशीर्वाद, चांगल्या गोष्टी निघून जातात आणि आयुष्यात दीर्घकाळ वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. कोणत्याही परिस्थितीत वाद आणि संघर्ष टाळले पाहिजेत. या दिवशी मोठ्यांच्या अपमानामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते.
advertisement
कधी साफसफाई करावी - अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळनंतर चुकूनही झाडू नका. झाडूमध्ये लक्ष्मी देवी वास करते, असे मानले जाते. संध्याकाळनंतर घर झाडू मारणे अशुभ मानले जाते. या दिवशी घर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्या. धनाची देवी लक्ष्मी कधीही अस्वच्छ घरात प्रवेश करत नाही. या दिवशी घर नीटनेटके-स्वच्छ न ठेवल्याने घरात नकारात्मकता आणि दुर्दैव येऊ शकतं. सकाळनंतर सूर्यास्तापूर्वी स्वच्छता करा. संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावरही बसू नये.
advertisement
अन्न आणि पाणी - अक्षय तृतीयेला कोणताही गरजू व्यक्ती, भिकारी किंवा प्राणी-पक्षी तुमच्या दारात आला तर त्यांना अन्न आणि पाणी दिल्याशिवाय जाऊ देऊ नका. असे न केल्यास मिळवलेल्या पुण्यांचे फायदे मिळत नाहीत. देवी लक्ष्मी कुटुंबावर क्रोधित होते आणि दुर्दैव आपली साथ सोडत नाही.
advertisement
उधार घेणे महागात पडेल - अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेऊन खरेदी करू नये. असे केल्याने समृद्धी नाही तर गरिबी येते. या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार दान करा. अक्षय तृतीयेला गरजूंना नक्कीच मदत करावी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतियेला आपल्या हातून या चुका होऊ नयेत; वाईट काळ त्यादिवसापासून सुरू होईल
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement