Nagpur Traffic: नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय; शहरात ‘या’ वाहनांना नो एंट्री, कारण काय?

Last Updated:

Nagpur Traffic: नागपूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे

Nagpur Traffic: नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय; शहरात ‘या’ वाहनांना नो एंट्री, कारण काय?
Nagpur Traffic: नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय; शहरात ‘या’ वाहनांना नो एंट्री, कारण काय?
नागपूर: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागपूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरात सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. नियम मोडणाऱ्यांना तब्बल 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. या कालावधीत शहरात ट्रक, ट्रेलर, कंटेनर, ट्रॅक्टर-ट्रॉली, मिक्सर इत्यादी जड वाहनं आल्यास त्यांना थेट 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बाहेरील रिंग रोडवरून प्रवास अनिवार्य
जड वाहनांना शहरात थेट प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांना आता आऊटर रिंग रोडचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. रेल्वे मालटर्मिनल, अजनी, कलमना, खापरखेडा, कांदळी यांसारख्या भागात जाणाऱ्या वाहनांनी रिंग रोडवरूनच वळसा घालावा लागणार आहे. या निर्णयामुळे वाहतूकदारांमध्ये खळबळ उडालेली बघायला मिळत आहे.
advertisement
8 सप्टेंबरपासून नियमांची अंमलबजावणी
वाहतूक पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी काढलेल्या आदेशानुसार हा नियम 8 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे शहरात जड वाहनांची दहशत मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे. जड वाहनांमुळे शहरात अनेक अपघात झाले आहेत. मागील पाच वर्षांत जड वाहनांच्या धडकेत तब्बल 477 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा कठोर निर्णय महत्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
advertisement
कोणत्या वाहनांना सूट?
शहरातील आवश्यक सेवांसाठी काही वाहनांना मात्र सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये महानगर पालिकेची वाहने, अग्निशमन दल, सैन्य दल, दूध वाहतूक करणारी वाहने, भाजीपाला, फळं व धान्य वाहतूक करणारी वाहने, औषध पुरवठा करणारी वाहनं, गॅस सिलिंडर वाहतूक करणारी वाहनं, डाक विभागाची वाहनं या वाहनांना मात्र वेळेची मर्यादा लागू होणार नाही.
advertisement
जड वाहनांमुळे होणारी गर्दी, अपघात व प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या शहरवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “शहरातील मुख्य रस्ते मोकळे होतील, अपघात टळतील आणि वाहतुकीत शिस्त येईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Traffic: नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय; शहरात ‘या’ वाहनांना नो एंट्री, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement