पाऊस मंदावला तरी धोका कायम! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील पाटण येथे कोयना धरण परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. सध्या धरणात...

Koyna Dam
Koyna Dam
पाटण, सातारा : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर आता काहीसा मंदावला असला तरी, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढलेली असून, नदीकाठच्या गावांना आणि वस्त्यांना प्रशासनाने पुन्हा एकदा सावधतेचा इशारा दिला आहे.
धरणाची सद्यस्थिती
सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी 33,815 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 85.44 टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) इतका झाला आहे. पाण्याची आवक कमी झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे 6 वक्री दरवाजे साडेसहा फुटांवरून चार फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत.
पाण्याचा विसर्ग आणि नदीपातळी
धरणातून विनावापर प्रतिसेकंद 19,724 क्युसेक पाणी सोडले जात आहे. याशिवाय, पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी असे एकूण 21,824 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे.
advertisement
गेल्या 24 तासांतील पाऊस आणि पाणीसाठा
गेल्या 24 तासांत (रविवार संध्याकाळी पाच ते सोमवार संध्याकाळी पाच या वेळेत) धरणातील पाणीसाठ्यात 2.87 टीएमसीने वाढ झाली आहे. याच कालावधीत कोयना परिसरात 49 मि.मी., नवजा येथे 32 मि.मी. आणि महाबळेश्वरमध्ये 63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 80.44 टीएमसी असून, पाण्याची उंची समुद्रसपाटीपासून 2147.3 फूट तर जलपातळी 654.482 मीटर इतकी झाली आहे.
advertisement
प्रशासनाचा इशारा
कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही विभागात अजूनही पाऊस पडत असल्याने, धरणात ज्या प्रमाणात पाण्याची आवक होईल, त्यानुसार कमी-जास्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या सर्व गावांनी आणि वस्त्यांनी सतर्क राहावे, असा प्रशासनाचा इशारा कायम आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/सातारा/
पाऊस मंदावला तरी धोका कायम! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement