मध्यरात्री मातोश्रीवर राडा, ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांमध्येच जुंपली, एकाने तडकाफडकी बैठकच सोडली
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी ठिणगी पडली आहे. ठाकरेंच्या दोन विश्वासू नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी ठिणगी पडली आहे. रविवारी रात्री 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत आमदार अनिल परब आणि युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यातील वाद टोकाला गेल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवाराच्या नावावरून झालेल्या या वादात अनिल परब संतापून बैठकीतून उठून निघून गेल्याने मातोश्रीवर तणाव निर्माण झाला.
वॉर्ड क्रमांक ९५ वरून जुंपली
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरून हा सर्व राडा झाला. अनिल परब यांनी या जागेसाठी त्यांचे खंदे समर्थक शेखर वैंगणकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, ऐनवेळी वैंगणकर यांचे तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली.
advertisement
अनिल परब संतापण्याचे कारण काय?
आदिक शास्त्री यांच्या नावासाठी वरुण सरदेसाई यांनी जोरदार शिफारस केली होती. आपल्या हक्काच्या मतदारसंघात आणि आपल्या समर्थकाचे तिकीट कापले गेल्याने अनिल परब यांचा संयम सुटला. बैठकीतच त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि वरुण सरदेसाई यांच्याशी त्यांची मोठी खडाजंगी झाली. वाद इतका वाढला की, अनिल परब बैठकीत तडक उठून बाहेर गेले.
advertisement
वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यातील या वादाला केवळ महापालिका निवडणुकीचे तिकीट कारणीभूत नाही, तर त्याला गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतभेदाची किनार असल्याचे बोललं जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील महत्त्वाच्या दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याने उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्यरात्री मातोश्रीवर राडा, ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांमध्येच जुंपली, एकाने तडकाफडकी बैठकच सोडली











