Mumbai News : पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा अडीच तासांचा वेळ वाचणार, 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक

Last Updated:

Western Railway : पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक 1 जानेवारीपासून लागू झाले आहे. यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या अधिक वेगाने धावणार असून प्रवाशांचा दररोज मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे.

News18
News18
मुंबई : पश्चिम रेल्वेने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. मेल-एक्स्प्रेस, मेमू आणि डेमू गाड्यांचे नवीन वेळापत्रक 1 जानेवारीपासून लागू करण्यात आले असून यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या तसेच मुंबईत येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आता अधिक वेगाने धावणार आहेत. या बदलांमुळे तब्बल 45 गाड्या त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी 2 ते 11 मिनिटे लवकर पोहोचणार आहेत.
प्रवास होणार अधिक वेगवान
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार एकूण 28 गाड्यांचा सरासरी वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दररोज सुमारे 157 मिनिटांची वेळ बचत होणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार असून प्रवास अधिक जलद आणि वेळेत पूर्ण होईल. काही प्रमुख गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वेळ कमी करण्यात आला आहे. हरिद्वार-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये 24 मिनिटांची वेळ वाचणार असून वांद्रे टर्मिनस-उदयपूर एक्स्प्रेसच्या प्रवासाच्या वेळेत 10 मिनिटांची बचत करण्यात आली आहे.
advertisement
तसेच अप दिशेतील सात गाड्या आता 2 ते 5 मिनिटे लवकर सुटणार आहेत तर डाउन दिशेतील नऊ गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत 5 ते 30 मिनिटांपर्यंत बदल करण्यात आला आहे. हे बदल गाड्यांची क्षमता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांना होणारे फायदे?
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे डब्यांमध्ये सुधारणा, काही ठिकाणच्या वेगमर्यादा हटवणे आणि क्रॉस सेक्शन कमी करणे अशा उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. काही गाड्यांना नवे थांबे देण्यात आल्याने लेटमार्कचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे.या नव्या वेळापत्रकामुळे गाड्या अधिक वेळेवर, जलद आणि आरामदायी होतील. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा पश्चिम रेल्वेने व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा अडीच तासांचा वेळ वाचणार, 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement