एक असं मंदिर... 2500 वर्षांहून अधिक जुनं, फक्त एकदा दर्शन घेतल्याने घर बनवण्याचं स्वप्न होत पूर्ण!

Last Updated:
एक असं मंदिर येथे घर व जमिनीच्या समस्यांवर उपाय मिळतो, 2500 वर्षांचा इतिहास आणि भक्तांची खास श्रद्धा जाणून घ्या.
1/7
कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यात, हेमावती नदीच्या तीरावर कल्लाहल्ली नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात स्थित असलेले 'श्री भू वराहनाथ स्वामी मंदिर' सध्या संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनले आहे. या मंदिराबाबत अशी श्रद्धा आहे की, ज्यांना स्वतःचे हक्काचे घर हवे आहे किंवा ज्यांचे जमिनीचे वाद सुरू आहेत, त्यांनी येथे दर्शन घेतल्यास त्यांच्या सर्व समस्या सुटतात.
कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यात, हेमावती नदीच्या तीरावर कल्लाहल्ली नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात स्थित असलेले 'श्री भू वराहनाथ स्वामी मंदिर' सध्या संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनले आहे. या मंदिराबाबत अशी श्रद्धा आहे की, ज्यांना स्वतःचे हक्काचे घर हवे आहे किंवा ज्यांचे जमिनीचे वाद सुरू आहेत, त्यांनी येथे दर्शन घेतल्यास त्यांच्या सर्व समस्या सुटतात.
advertisement
2/7
घर आणि जमिनीशी संबंधित इच्छापूर्ती: या मंदिराची सर्वात मोठी ओळख म्हणजे 'भूमी विरूद्धच्या समस्यांचे निराकरण'. ज्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होत नाहीये किंवा ज्यांचे मालमत्तेचे वाद न्यायालयात अडकले आहेत, असे हजारो भाविक येथे येऊन प्रार्थना करतात. येथे दर्शनानंतर घर बांधण्याचे काम निर्विघ्नपणे पूर्ण होते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
घर आणि जमिनीशी संबंधित इच्छापूर्ती: या मंदिराची सर्वात मोठी ओळख म्हणजे 'भूमी विरूद्धच्या समस्यांचे निराकरण'. ज्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होत नाहीये किंवा ज्यांचे मालमत्तेचे वाद न्यायालयात अडकले आहेत, असे हजारो भाविक येथे येऊन प्रार्थना करतात. येथे दर्शनानंतर घर बांधण्याचे काम निर्विघ्नपणे पूर्ण होते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
advertisement
3/7
भगवान विष्णूंचा 18 फूट भव्य अवतार: या मंदिरात भगवान विष्णूंचा तिसरा अवतार असलेल्या 'वराह' देवाची विशाल मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे 18 फूट उंच असून ती एकाच पाषाणातून कोरलेली आहे. वराह देवाच्या मांडीवर देवी भूदेवी विराजमान आहे.
भगवान विष्णूंचा 18 फूट भव्य अवतार: या मंदिरात भगवान विष्णूंचा तिसरा अवतार असलेल्या 'वराह' देवाची विशाल मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे 18 फूट उंच असून ती एकाच पाषाणातून कोरलेली आहे. वराह देवाच्या मांडीवर देवी भूदेवी विराजमान आहे.
advertisement
4/7
2500 वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास: असे मानले जाते की, हे मंदिर 2500 वर्षांहून अधिक जुने आहे. पौराणिक कथेनुसार, गौतम ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांनीच या मूर्तीची स्थापना केली होती. पुढे होयसाळ वंशाच्या राजांनी या मंदिराचा विस्तार केला.
2500 वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास: असे मानले जाते की, हे मंदिर 2500 वर्षांहून अधिक जुने आहे. पौराणिक कथेनुसार, गौतम ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांनीच या मूर्तीची स्थापना केली होती. पुढे होयसाळ वंशाच्या राजांनी या मंदिराचा विस्तार केला.
advertisement
5/7
हेमावती नदीचे सानिध्य: हे मंदिर हेमावती नदीच्या पात्रात वसलेले आहे. पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा नदीचे पाणी थेट मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पोहोचते. मंदिराभोवतीचे शांत आणि नैसर्गिक वातावरण भाविकांना आध्यात्मिक शांतता देते.
हेमावती नदीचे सानिध्य: हे मंदिर हेमावती नदीच्या पात्रात वसलेले आहे. पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा नदीचे पाणी थेट मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पोहोचते. मंदिराभोवतीचे शांत आणि नैसर्गिक वातावरण भाविकांना आध्यात्मिक शांतता देते.
advertisement
6/7
ससा आणि कुत्र्याची रंजक कथा: मंदिराच्या निर्मितीमागे एक लोककथा सांगितली जाते. होयसाळ राजा वीर बल्लाळ एकदा शिकार करताना या जंगलात रस्ता भरकटला. तेव्हा त्याने पाहिले की, एक ससा शिकारी कुत्र्याचा पाठलाग करत आहे. या जमिनीतील विलक्षण शक्ती ओळखून राजाने तिथे उत्खनन केले आणि जमिनीखाली गाडली गेलेली वराह देवाची ही मूर्ती बाहेर काढली.
ससा आणि कुत्र्याची रंजक कथा: मंदिराच्या निर्मितीमागे एक लोककथा सांगितली जाते. होयसाळ राजा वीर बल्लाळ एकदा शिकार करताना या जंगलात रस्ता भरकटला. तेव्हा त्याने पाहिले की, एक ससा शिकारी कुत्र्याचा पाठलाग करत आहे. या जमिनीतील विलक्षण शक्ती ओळखून राजाने तिथे उत्खनन केले आणि जमिनीखाली गाडली गेलेली वराह देवाची ही मूर्ती बाहेर काढली.
advertisement
7/7
मृत्तिका पूजा: येथे घराच्या स्वप्नासाठी 'मृत्तिका पूजा' केली जाते. भाविक मंदिरातील पवित्र माती घरी घेऊन जातात आणि नवीन घर बांधताना किंवा घराच्या वास्तुशांतीच्या वेळी तिचा वापर करतात. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो, अशी धारणा आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मृत्तिका पूजा: येथे घराच्या स्वप्नासाठी 'मृत्तिका पूजा' केली जाते. भाविक मंदिरातील पवित्र माती घरी घेऊन जातात आणि नवीन घर बांधताना किंवा घराच्या वास्तुशांतीच्या वेळी तिचा वापर करतात. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो, अशी धारणा आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement