'महाराष्ट्रासाठी एकत्र या', दादांच्या निधनानंतर दिग्गज अभिनेत्याची भावनिक साद, घेतली सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ajit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली असून, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सयाजी शिंदे यांनी पुढे एक महत्त्वाची साद घातली. ते म्हणाले, "दादांचा जो उमदा स्वभाव, निर्णय घेण्याचा स्वभाव पुन्हा महाराष्ट्रात यावा या दृष्टीने दादाचं स्वप्न पूर्ण व्हावं. आणि ताकद वाढवायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. यानिमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं. झालेल्या दुःखावर आपण काही बोलू शकत नाही सध्या. कोणीच काही बोलू शकत नाही."
advertisement
अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गट पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहेत. त्यातच आमदार रोहित पवार यांनी येत्या १२ तारखेला एका पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं जाहीर केल्याने सस्पेन्स वाढला आहे.
advertisement
दुसरीकडे, सुनील शेळके यांनीही सूचक विधान केलं आहे की, अजितदादांची यापूर्वीच शरद पवार आणि इतर नेत्यांशी विलीनीकरणाबाबत चर्चा झाली असावी. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "ज्या नेत्याने मला ३०-४० वर्षे सांभाळलं, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य आहे तेच बोललो. जर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जबाबदारीने पाऊल उचललं आणि पक्ष एकत्र आणला, तर ते व्हिलन कसे ठरू शकतात?"
advertisement





