'लोकांना त्यांचे दोष दाखवणं...', अभिजीत सावंतने का घेतला Bigg Boss मध्ये जाण्याचा निर्णय? शोनंतर एका वर्षाने मोठा खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Abhijeet Sawant: अभिजीतने या शोमध्ये केवळ खेळच खेळला नाही, तर प्रेक्षकांची मनंही जिंकली. तो उपविजेता ठरला, पण या शोमध्ये जाण्याचा त्याचा उद्देश ट्रॉफी जिंकण्यापेक्षा काहीतरी वेगळाच होता.
advertisement
advertisement
advertisement
अभिजीतने 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत प्रांजळपणे कबुली दिली की, तो बिग बॉसमध्ये केवळ प्रसिद्धीसाठी गेला नव्हता. तो म्हणाला, "बाहेरचे लोक मला नेहमी म्हणतात की मी खूप चांगला माणूस आहे. पण कधीकधी आपल्याला स्वतःबद्दलच शंका येते. मी खरंच इतका चांगला आहे का? माझ्यातही काही दोष असतीलच ना, मग ते दोष काय आहेत; ते मला जाणून घ्यायचं होतं."
advertisement
अभिजीतच्या मते, सर्वांमध्येच काहीनं काही दोष असतातच. तुम्ही त्याच्यावर कसं काम करता, हे महत्त्वाचं आहे. एखाद्याला तुम्ही त्याच्यातले दोष दाखवता, तेव्हा तुमचं चांगलं वर्तनही दाखवू शकता. नाही तर काही लोकांना त्यांचे दोष दाखवणं जास्त गरजेचं वाटतं. पण त्याला स्वतःला ओळखायचं होतं, स्वत:ला जाणून घ्यायचं होतं. म्हणून तो बिग बॉस मध्ये गेलो.
advertisement
अभिजीत सावंत एका मोठ्या काळानंतर पडद्यावर परतला होता. मध्यंतरीच्या काळात तो नक्की कुठे आहे? काय करतोय? यावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. प्रसिद्धी झोतातून अचानक शांततेत जगण्याचा निर्णय त्याने घेतला. मात्र, बिग बॉसमध्ये जाण्याने त्याला केवळ स्वतःला ओळखण्याची संधी मिळाली नाही, तर प्रेक्षकांशी पुन्हा नातं जोडण्याचं एक मोठं व्यासपीठ मिळालं.
advertisement
advertisement










