बकरीचं दूध आणि कांदा, उन लागल्यावर तुम्ही कधी केला वापर? मराठवाड्यातला रामबाण उपाय

Last Updated:
मराठवाड्यातील ग्रामीण भागामध्ये आजही अनेक जण बकरीच्या दुधाचा वापर हा उन्हाळी वर जालीम उपाय म्हणून करतात. पाहुयात कशा पद्धतीने बकरीच्या दुधाचा वापर करून आपण उन्हाळी पासून मुक्तता मिळवू शकतो.
1/6
राज्यात सगळीकडेच उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत देखील पोहोचले आहे. तापमान वाढताच अनेकांना उन्हाळी लागण्याची समस्या पाहायला मिळते.
राज्यात सगळीकडेच उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत देखील पोहोचले आहे. तापमान वाढताच अनेकांना उन्हाळी लागण्याची समस्या पाहायला मिळते.
advertisement
2/6
बकरीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम असतं. बकरीही रानमाळावर, शेताच्या बांधावर, ओढ्याच्या काठाला चरत असल्याने ती विविध प्रकारच्या औषधी वनस्पती खात असते. त्यामुळे बकरीच्या दुधामध्ये अनेक पोषक तत्व असतात.
बकरीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम असतं. बकरीही रानमाळावर, शेताच्या बांधावर, ओढ्याच्या काठाला चरत असल्याने ती विविध प्रकारच्या औषधी वनस्पती खात असते. त्यामुळे बकरीच्या दुधामध्ये अनेक पोषक तत्व असतात.
advertisement
3/6
त्यामुळे बकरीच्या दुधाचा चहा देखील आपल्या आरोग्याला चांगला असतो. तर उन्हाळ्यामध्ये अनेकांना ऊन लागण्याची तसेच उन्हाळी लागण्याची समस्या पाहायला मिळते यावर बकरीचे दूध हा परिणामकारक उपाय आहे.
त्यामुळे बकरीच्या दुधाचा चहा देखील आपल्या आरोग्याला चांगला असतो. तर उन्हाळ्यामध्ये अनेकांना ऊन लागण्याची तसेच उन्हाळी लागण्याची समस्या पाहायला मिळते यावर बकरीचे दूध आणि कांदा हा परिणामकारक उपाय आहे.
advertisement
4/6
उन्हाळ्यात लेकरांना ऊन लागलं तर बकरीचं हातोहात काढलेलं दूध तळपायांना, तळहातांना लावायचे. तसेच एक किंवा दोन थेंब कानामध्ये टाकायचे. लहान बाळाच्या टाळूवर दुधाचे दोन तीन थेंब लावायचे याने उन्हाळीच्या त्रासापासून तत्काळ मुक्तता मिळते.
उन्हाळ्यात लेकरांना ऊन लागलं तर बकरीचं हातोहात काढलेलं दूध तळपायांना, तळहातांना लावायचे. तसेच एक किंवा दोन थेंब कानामध्ये टाकायचे. लहान बाळाच्या टाळूवर दुधाचे दोन तीन थेंब लावायचे याने उन्हाळीच्या त्रासापासून तत्काळ मुक्तता मिळते.
advertisement
5/6
हा उपाय केवळ लहान बाळांसाठीच नव्हे तर सर्व वयोगटांच्या महिला आणि पुरुषांसाठी उपयुक्त ठरतो. बकरीचे दूध तळपाय, तळहाताने लावल्यानंतर हातांना, पायांना थंडावा मिळतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होते. साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये उन्हाळी लागलेल्या व्यक्तीला बकरीच्या दुधाने परिणाम जाणवतो, असं जाणकार विठ्ठल काळे यांनी सांगितलं.
हा उपाय केवळ लहान बाळांसाठीच नव्हे तर सर्व वयोगटांच्या महिला आणि पुरुषांसाठी उपयुक्त ठरतो. बकरीचे दूध तळपाय, तळहाताने लावल्यानंतर हातांना, पायांना थंडावा मिळतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होते. साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये उन्हाळी लागलेल्या व्यक्तीला बकरीच्या दुधाने परिणाम जाणवतो, असं जाणकार विठ्ठल काळे यांनी सांगितलं.
advertisement
6/6
आम्ही हा उपाय आमच्या आजोबा पणजोबापासून उपयोगात आणत आहे. आजही ग्रामीण भागामध्ये ऊन लागल्यानंतर बकरीच्या दुधाचा वापर केला जातो. अनेकांना याबाबत माहिती नाही मात्र ज्यांना माहिती आहे ते बकरीच्या दुधाचा वापर अवश्य करतात, असं देखील काळे यांनी सांगितलं. तेव्हा तुम्हाला देखील कधी उन्हाळीचा किंवा उष्णतेचा त्रास झाला तर बकरीच्या दुधाचा वापर आवश्य करून बघा.
आम्ही हा उपाय आमच्या आजोबा पणजोबापासून उपयोगात आणत आहे. आजही ग्रामीण भागामध्ये ऊन लागल्यानंतर बकरीच्या दुधाचा वापर केला जातो. अनेकांना याबाबत माहिती नाही मात्र ज्यांना माहिती आहे ते बकरीच्या दुधाचा वापर अवश्य करतात, असं देखील काळे यांनी सांगितलं. तेव्हा तुम्हाला देखील कधी उन्हाळीचा किंवा उष्णतेचा त्रास झाला तर बकरीच्या दुधाचा वापर आवश्य करून बघा.
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement