सकाळी रिकाम्या पोटी फळं खाणं खरंच योग्य की अयोग्य? आहार तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
वर्षभरात वेगवेगळ्या ऋतुमानानुसार बाजारात वेगवेगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. पण ही फळे कधी खावीत याबाबत जाणून घेऊ.
बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर भूक लागते. अशावेळी फळे, दूध, चहा किंवा नाश्त्याचे पदार्थ यापैकी काहीही खाल्ले जाते. काहीजण सकाळी उठल्यावर तब्येतीसाठी म्हणून फळांचे सेवन करतात. पण उपाशी पोटी फळे खाणे खरंच शारीरिक दृष्ट्या चांगले असते का? हे देखील जाणून घेणं गरजेचे आहे. कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञ स्नेहल पै यांनी याबाबत माहिती दिलीय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सकाळी उपाशीपोटी फळे खाणे कधीही चांगलेच. मात्र सकाळच्या नाष्ट्याऐवजी फक्तच फळे खाणे अयोग्य आहे. कारण सकाळच्या वेळी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ती फक्त फळांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच दिवसभर थकवा जाणवून सारखी भूक लागू शकते. अशावेळी फळांसोबत उकडलेली अंडी किंवा मोड आलेली कडधान्य खावीत.
advertisement
रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याच जणांना फळे खाण्याची सवय असते. मात्र रात्री झोपण्याआधी, जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच फळे खाऊ नयेत. ज्यांना अॅसिडिटीचा खूप त्रास होतो त्यांनी देखील सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नये. सकाळ ऐवजी अशा लोकांनी दोन जेवणांच्या मध्ये फळे खावीत. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनीही गोड फळे सकाळी उपाशीपोटी खाणे टाळावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement