Monsoon Health Tips: डोकेदुखी अन् पोटदुखी, पावसाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी, डॉक्टरांच्या महत्त्वाच्या टिप्स

Last Updated:
वातावरणातील आर्द्रता, दूषित अन्न-पाणी आणि हवामानातील सतत बदल यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
1/7
पावसाळा म्हणजे हिरवळ, गारवा आणि सुट्टीचा आनंद. पण त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजारही या ऋतूमध्ये डोके वर काढतात. विशेषतः उलट्या आणि डोकेदुखी या समस्या या दिवसांमध्ये अधिक प्रमाणात जाणवतात.
पावसाळा म्हणजे हिरवळ, गारवा आणि सुट्टीचा आनंद. पण त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजारही या ऋतूमध्ये डोके वर काढतात. विशेषतः उलट्या आणि डोकेदुखी या समस्या या दिवसांमध्ये अधिक प्रमाणात जाणवतात.
advertisement
2/7
वातावरणातील आर्द्रता, दूषित अन्न-पाणी आणि हवामानातील सतत बदल यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याबाबत पुण्यातील आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांच्याकडून जाणून घेऊ.
वातावरणातील आर्द्रता, दूषित अन्न-पाणी आणि हवामानातील सतत बदल यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याबाबत पुण्यातील आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
3/7
डॉ. स्मिता सांगडे सांगतात की, पावसाळ्यात प्रामुख्याने पोटाचे विकार होण्याचं प्रमाण अधिक असतं. दूषित पाणी आणि रस्त्यावरचे अन्न खाल्ल्याने उलट्या, जुलाब, डोकेदुखी, ताप अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी उकळून थंड केलेलं आणि स्वच्छ पाणी प्यावं. तसेच बाहेरचे अन्न शक्यतो टाळावं.
डॉ. स्मिता सांगडे सांगतात की, पावसाळ्यात प्रामुख्याने पोटाचे विकार होण्याचं प्रमाण अधिक असतं. दूषित पाणी आणि रस्त्यावरचे अन्न खाल्ल्याने उलट्या, जुलाब, डोकेदुखी, ताप अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी उकळून थंड केलेलं आणि स्वच्छ पाणी प्यावं. तसेच बाहेरचे अन्न शक्यतो टाळावं.
advertisement
4/7
डोकेदुखी आणि उलट्यांपासून बचावासाठी अन्नपदार्थ स्वच्छतेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी तयार झालेलं असावं. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध यांना पावसाळ्यात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
डोकेदुखी आणि उलट्यांपासून बचावासाठी अन्नपदार्थ स्वच्छतेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी तयार झालेलं असावं. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध यांना पावसाळ्यात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
advertisement
5/7
पावसात भिजल्यावर ओले कपडे लवकरात लवकर बदलावेत. अंग कोरडं करावं, अन्यथा त्वचेचे आजार आणि स्किन इन्फेक्शन आणि डोकेदुखी होण्याची शक्यता असते. घराबाहेर जाताना छत्री किंवा रेनकोटचा वापर करावा आणि गरज असल्यास गरम कपडे परिधान करावेत.
पावसात भिजल्यावर ओले कपडे लवकरात लवकर बदलावेत. अंग कोरडं करावं, अन्यथा त्वचेचे आजार आणि स्किन इन्फेक्शन आणि डोकेदुखी होण्याची शक्यता असते. घराबाहेर जाताना छत्री किंवा रेनकोटचा वापर करावा आणि गरज असल्यास गरम कपडे परिधान करावेत.
advertisement
6/7
शरीराची प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी सकस आहार, भरपूर पाणी, वेळेवर झोप आणि व्यायाम करणे गरजच आहे. लक्षणं गंभीर वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शरीराची प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी सकस आहार, भरपूर पाणी, वेळेवर झोप आणि व्यायाम करणे गरजच आहे. लक्षणं गंभीर वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
7/7
पावसाळ्याचा आनंद लुटताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे, असं डॉ. सांगडे सांगतात.
पावसाळ्याचा आनंद लुटताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे, असं डॉ. सांगडे सांगतात.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement