Potato : बटाटे लवकर कुजतात किंवा मोड येतात? मग तुमटी पद्धत चुकतेय, घरी असा टिकवा बटाटा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा महिलांची एकच तक्रार असते "बाजारातून बटाटे आणले की चार दिवसांतच ते मऊ पडतात, त्यांना मोड येतात किंवा ते कुजायला लागतात." मग आता करायचं काय?
कांद्याप्रमाने बटाटा देखील स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. तो जवळ-जवळ सगळ्याच भाजीत टाकला जातो. शिवाय त्याच्या वेगवेगळ्या भाज्या ही बनवल्या जातात. वडापाव असो, भाजी असो वा मुलांचे लाडके वेफर्स, बटाटा हा हवाच. पण अनेकदा महिलांची एकच तक्रार असते "बाजारातून बटाटे आणले की चार दिवसांतच ते मऊ पडतात, त्यांना मोड येतात किंवा ते कुजायला लागतात."
advertisement
advertisement
advertisement
कांदा आणि बटाटा 'या' जोडीला लांबच ठेवाआपल्यापैकी बहुतेक महिला एकाच टोपलीत खाली बटाटे आणि वर कांदे ठेवतात. पण हीच सर्वात मोठी चूक आह. कांद्यातून 'इथिलिन' नावाचा वायू बाहेर पडतो, ज्यामुळे बटाटे लवकर पिकतात आणि त्यांना मोड फुटू लागतात.काय कराल? कांदे आणि बटाटे नेहमी वेगवेगळ्या टोपलीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घाईघाईत आपण बटाटे फ्रीजमध्ये ठेवतो. बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमधील थंडीमुळे बटाट्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते, ज्यामुळे त्याची चव गोड होते आणि शिजल्यावर तो काळा पडतो. बटाटे फक्त कांद्यापासून लांब ठेवलं आणि हवा खेळती राहिली, तरी तुमचे बटाटे 15-20 दिवस आरामात टिकतील. या साध्या टिप्स वापरून बघा आणि तुमची होणारी नासाडी थांबवा.










