प्रवाशांनी खचाखच भरले होते प्लॅटफॉर्म, दीड लाख लिटरची टाकी कोसळली...अन् घडला अनर्थ!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
13 डिसेंबरच्या दुपारी संपूर्ण देश हादरला. एकामागून एक मोठ्या दुर्घटना समोर आल्या. संसदेत लोकसभागृहाच्या चालू कामकाजात अज्ञातांनी उड्या घेतल्या आणि एकच गदारोळ झाला. मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर भीषण आग लागली. तर, याच दिवशी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी पश्चिम बंगालच्या बर्धमान रेल्वे स्थानकावर मोठा अपघात घडला. यात 3 जणांनी आपला जीव गमावला, तर जवळपास 28जण जखमी झाले.
भरदुपारी प्रवासी घामाघूम होऊन बर्धमान रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत होते. सर्व प्लॅटफॉर्म प्रवाशांनी खचाखच भरले होते. तेवढ्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 2-3 दरम्यान पाण्याची टाकी (Overhead water tank) कोसळली आणि घोळक्याच्या किंचाळण्याचा भयंकर आवाज झाला. या टाकीखाली अनेक प्रवासी दबले गेले. नेमकं घडलं काय, हे कळण्याच्याही मन:स्थितीत ते नव्हते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement