Weather Alert: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय हिम वादळ; हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात डिसेंबरअखेर थंडीचा कडाका वाढला आहे. 29 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
राज्यात थंडीचा प्रभाव अद्याप कायम असून किमान तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत सकाळच्या वेळी गारठा अधिक जाणवत असून काही भागांत तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. निफाड, धुळे, अहिल्यानगर आणि परभणी या भागांत किमान तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात आलं आहे. 29 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांतील हवामान स्थिती कशी राहील? पाहुयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
राज्यातील अनेक भागांत किमान तापमान कमी जास्त होत असल्याने थंडीचा प्रभाव देखील कमी जास्त होत आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरणे, सकाळी व रात्री अनावश्यक बाहेर पडणे टाळणे, तसेच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.











