Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, आता लाट येणार, बुधवारी या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
12 नोव्हेंबर रोजी राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून तापमानात घट झालेली बघायला मिळणार आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री आणि सकाळी वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत कमी तापमानाची नोंद झाली होती. आताही तेथील तापमानात सातत्याने घट होत आहे. 12 नोव्हेंबर रोजी राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून तापमानात घट झालेली बघायला मिळणार आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री आणि सकाळी वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. पाहुयात, 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर ठिकाणी तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात देखील कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहून तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये निरभ्र आकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement


