Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा संकट, सोमवारी उष्णतेची लाट येणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
फेब्रुवारीच्या मध्यास येणाऱ्या उन्हाचा तडाखा राज्यभर जाणवणार असून, किमान तापमानातही हळूहळू वाढ होईल. नवीन पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव 17 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता असली तरी 16 तारखेला राज्यात पावसाची शक्यता नाही.
16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या मध्यास येणाऱ्या उन्हाचा तडाखा राज्यभर जाणवणार असून, किमान तापमानातही हळूहळू वाढ होईल. नवीन पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव 17 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता असली तरी 16 तारखेला राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, वाऱ्याच्या दिशेत बदलामुळे किनारी भागात उष्णता आणि आर्द्रता वाढेल, ज्यामुळे उकाडा जाणवेल.
advertisement
कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत 16 फेब्रुवारीला प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्ण वातावरण राहील. मुंबईत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस आणि किमान 22 ते 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी हलके धुके जाणवू शकते, पण दुपारनंतर उष्णता वाढेल. समुद्रकिनारी भागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवेल. पाऊस किंवा ढगाळपणाची शक्यता नगण्य आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातही कोरडे आणि उष्ण हवामान असेल. पुणे आणि सोलापूरमध्ये कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर किमान 18 ते 22 अंश असेल. सकाळी थंडी कमी होऊन दुपारी उन्हाचा जोर वाढेल. शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








