Weather Alert : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामानाचा अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
advertisement
मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 23 मे रोजी तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तेथील तापमान 21 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 23 मे साठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात वातावरण ढगाळ आणि पावसाळी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक महत्वाचे आहे.