शनी चालणार चांदीच्या पावलांनी, 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळवणार सुखांनी, होणार भरभराट!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांचा वेळोवेळी राशीप्रवेश होतो. त्याचा चांगला, वाईट प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. शनी ग्रहाचा एका राशीत तब्बल अडीच वर्षे मुक्काम असतो. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. येत्या होळीनंतर त्याचा मीन राशीत प्रवेश होईल. त्यातून 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब अक्षरश: उजळून निघेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सर्व ग्रहांची स्वत:ची विशिष्ट ओळख आहे. शनी हा क्रूर ग्रह मानला जातो कारण तो प्रत्येक व्यक्तीच्या पाप-पुण्याचा हिशेब करून त्यानुसार चांगलं, वाईट फळ देतो. हा ग्रह शक्तीशाली असल्यानं त्याचं फळही तसंच प्रबळ असतं.
advertisement
ज्योतिषांनी सांगितलं की, शनी सोनं, चांदी, लोखंड किंवा तांब्याच्या पायानं एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या 29 मार्चला शनीचा चांदीच्या पायानं मीन राशीत प्रवेश होईल. शनी गोचर किंवा राशी परिवर्तनावेळी जेव्हा चंद्र शनीपासून दुसऱ्या, पाचव्या किंवा नवव्या स्थानी असतो तेव्हा हा चांदीचा पाया मानला जातो, जो अत्यंत शुभ मानतात. शनी चांदीच्या पायानं येणं म्हणजे सुखाचं आगमन होणं, अशी मान्यता आहे. 29 मार्चला नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना शनीकडून लाभ मिळणार, जाणून घेऊया.
advertisement







