Kundali Gun Julavne: लग्नासाठी कुंडलीतील गुण जुळणं का महत्त्वाचं? इथं ओक्के असेल तरच उडवा बार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Kundali Gun julavane: हिंदू धर्मात वधू-वरांच्या कुंडलीतील गुण जुळणं लग्न ठरवण्याच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. दोघांचे किती गुण जुळतात, त्या आधारे लग्न होऊ शकते की नाही, हे ठरविले जाते. लग्न जुळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एकूण 36 गुण सांगण्यात आले आहेत. वधू-वरांच्या लग्नासाठी किमान 18 गुण जुळणं गरजेचं असतं, तरच लग्न झाल्यानंतर संसार चांगला होऊ शकतो, असे मानले जाते. हे गुण जुळले नाहीत तर संसारात प्रचंड विघ्न येतात असं ज्योतिषशास्रानुसार सांगितलं जातं. ज्यावर बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे. जाणून घेऊया लग्नासाठी कोणते 36 गुण आवश्यक आहेत, आणि वधू-वरांची पत्रिका जुळवताना इतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात.
कसे ठरतात 36 गुण ?ज्योतिषी दैवज्ञ मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या वेळी कुंडली जुळवताना अष्टकूट गुण दिसतात. यामध्ये नाडीचे 8 गुण, भकूटचे 7 गुण, गण मैत्रीचे 6 गुण, ग्रह मैत्रीचे 5 गुण, योनी मैत्रीचे 4 गुण, नक्षत्राचे 3 गुण, वास्यचे 2 गुण आणि वर्णाचा 1 गुण असतो अशा प्रकारे एकूण 36 गुण होतात.
advertisement
लग्नानंतर वधू-वराचे संबंध एकमेकांशी मैत्रीपूर्ण असावेत, संतती असावी, सुख-संपत्तीत वृद्धी व्हावी, दीर्घायुष्य लाभावे, यासाठी वधूपक्ष व वरपक्ष या दोघांकडून किती गुण जुळतात, हे पाहिले जाते. 'मुहूर्तचिंतामणी अष्टकूट' या ग्रंथात वर्ण, वास्य, नक्षत्र, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडी यांचा समावेश आहे.
advertisement
किती गुण जुळल्यावर विवाह होतो?लग्नासाठी वधू-वरांचे किमान 18 गुण जुळणं योग्य मानलं जातं. एकूण 36 गुणांपैकी 18 ते 21 गुण आढळल्यास गुणमिलन मध्यम मानलं जातं. यापेक्षा जास्त जुळले, तर त्याला शुभ विवाह मिलन म्हणतात. कोणत्याही वधू-वराचे 36 गुण जुळणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीराम आणि माता सीतेचे 36 गुण जुळले होते.
advertisement
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा -जर कोणाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल, तर त्याचे लग्न फक्त मंगळ दोष असलेल्या व्यक्तीसोबतच करावं. त्याने मंगळ दोष नसलेल्या व्यक्तीशी लग्न करू नये. लग्न झाले तर ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी ते चांगले मानले जात नाही. हिंदू धर्मात लग्न जुळवताना कुंडली पाहण्याची खूप जुनी परंपरा आहे. आजही ही परंपरा पाळली जाते. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.








