advertisement

IND vs NZ : तिसरी मॅच जिंकली, पण 3 चुकांनी टेन्शन वाढवलं, वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची धाकधूक वाढली!

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
1/6
न्यूझीलंडने दिलेलं 154 रनचं आव्हान टीम इंडियाने फक्त 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्माने 20 बॉलमध्ये 340 च्या स्ट्राईक रेटने 68 रन केले, ज्यात 5 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता.
न्यूझीलंडने दिलेलं 154 रनचं आव्हान टीम इंडियाने फक्त 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्माने 20 बॉलमध्ये 340 च्या स्ट्राईक रेटने 68 रन केले, ज्यात 5 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता.
advertisement
2/6
कर्णधार सूर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये 219.23 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 57 रनची खेळी केली. सूर्याने त्याच्या इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 6 फोर मारल्या. इशान किशन 13 बॉलमध्ये 28 रन करून आऊट झाला.
कर्णधार सूर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये 219.23 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 57 रनची खेळी केली. सूर्याने त्याच्या इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 6 फोर मारल्या. इशान किशन 13 बॉलमध्ये 28 रन करून आऊट झाला.
advertisement
3/6
सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला असला तरी टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर संजू सॅमसनच्या फॉर्मने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. लागोपाठ तिसऱ्या सामन्यात संजू अपयशी ठरला आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये संजू पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.
सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला असला तरी टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर संजू सॅमसनच्या फॉर्मने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. लागोपाठ तिसऱ्या सामन्यात संजू अपयशी ठरला आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये संजू पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.
advertisement
4/6
टीम इंडियासाठी दुसरी चिंतेची बाब म्हणजे ओपनिंग जोडी. पहिल्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली, पण दुसऱ्या सामन्यात अभिषेक शून्यवर माघारी परतला. या सीरिजमध्ये टीम इंडियाला एकदाही चांगली ओपनिंग पार्टनरशीप मिळालेली नाही.
टीम इंडियासाठी दुसरी चिंतेची बाब म्हणजे ओपनिंग जोडी. पहिल्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली, पण दुसऱ्या सामन्यात अभिषेक शून्यवर माघारी परतला. या सीरिजमध्ये टीम इंडियाला एकदाही चांगली ओपनिंग पार्टनरशीप मिळालेली नाही.
advertisement
5/6
कुलदीप यादवचा फॉर्मही टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारा आहे. मागच्या 11 इनिंगनंतर पहिल्यांदाच कुलदीपला एकही विकेट मिळाली नाही. वनडे सीरिजमध्येही कुलदीपला त्याचा ठसा पाडण्यात अपयश आलं होतं.
कुलदीप यादवचा फॉर्मही टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारा आहे. मागच्या 11 इनिंगनंतर पहिल्यांदाच कुलदीपला एकही विकेट मिळाली नाही. वनडे सीरिजमध्येही कुलदीपला त्याचा ठसा पाडण्यात अपयश आलं होतं.
advertisement
6/6
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे, त्याआधी टीम इंडिया फक्त 2 टी-20 मॅच खेळणार आहे. या दोन सामन्यांमध्ये भारताला त्यांच्या या 3 चुका सुधाराव्या लागणार आहेत.
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे, त्याआधी टीम इंडिया फक्त 2 टी-20 मॅच खेळणार आहे. या दोन सामन्यांमध्ये भारताला त्यांच्या या 3 चुका सुधाराव्या लागणार आहेत.
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement