भुकंपापासून घर वाचवायचं असेल, तर फाॅलो करा 'हे' वास्तुनियम; घरासहीत कुटुंबही राहील सुरक्षित!

Last Updated:

2025 मधील सर्वात मोठा भूकंप म्यानमार आणि थायलंडमध्ये झाल्याने भारतातही अशा आपत्तीचा धोका संभवतो. घर सुरक्षित ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. योग्य जमिनीची... 

News18
News18
म्यानमार आणि थायलंडमध्ये या वर्षातील सर्वात मोठा भूकंप झाला आणि तो पाहून लोकांच्या मनात एकच प्रश्न आला आहे की, जर असा भूकंप भारतात आला तर काय होईल? विचार करायलाही भीती वाटते, पण या भीतीवर मात करून आतापासूनच तुम्ही वास्तुशास्त्राचे काही नियम पाळायला हवेत. या नियमांनुसार, केवळ तुमचे घर भूकंपापासून सुरक्षित राहणार नाही, तर तुम्हाला घराच्या सुरक्षिततेची काळजीही राहणार नाही. यासोबतच कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. वास्तू नेहमीच भारतीय प्राचीन प्रणालीचा भाग राहिली आहे, अशा स्थितीत तुम्ही तुमच्या सोयीनुसार वास्तुचे नियम पाळू शकता. चला तर मग जाणून घेऊया... भूकंपापासून घराचे संरक्षण करण्यासाठी वास्तु नियम!
घराच्या भिंतींची घ्या काळजी
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घर बांधत असाल, तर जमीन वाकडी आहे की नाही हे तपासा. घराच्या भिंती समान दिशेत आणि कुठूनही वाकड्या नसाव्यात. जर भिंती समान आणि सरळ रेषेत नसतील, तर भूकंपात घराला नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो.
घर बांधत असाल की, पायाची माती ओलावा नसलेली असेल, तर सर्वप्रथम मातीची तपासणी करून घ्या, हल्ली माती तपासणे पूर्णपणे बंद झाले आहे. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही जमिनीच्या तुकड्यावर घर बांधत असाल, तर खात्री करा की तिथली माती जास्त कठीण किंवा जास्त मऊ नसावी. या गोष्टींची काळजी घेतल्यास पायाला तडे जाणार नाहीत आणि घर भूकंपापासून सुरक्षित राहील.
advertisement
घराच्या पायामध्ये या गोष्टी टाका
वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जर तुम्ही घराच्या पायामध्ये हळकुंड, चांदीच्या सापांचे जोड, कलश, पवित्र धागा, नाणी, फळे, तुळशी आणि नागवेलीची पाने, लोखंडी खिळे, पंचरत्न, गूळ, मध, नारळ, शेण, गंगाजल यांसारख्या गोष्टी ठेवल्या तर पाया खूप मजबूत होतो. यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात.
advertisement
खिडक्या आणि दारांची घ्या काळजी
जर तुम्ही घर बांधत असाल, तर लक्षात ठेवा की ते खालून अरुंद आणि वरून रुंद नसावे. येथे तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळावे लागतील आणि या नियमानुसार खालचा भाग जड असावा. तसेच खिडकी आणि दारांचे कोपऱ्यांपासूनचे अंतर समान असावे हे लक्षात ठेवा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
भुकंपापासून घर वाचवायचं असेल, तर फाॅलो करा 'हे' वास्तुनियम; घरासहीत कुटुंबही राहील सुरक्षित!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement