Religious: कुलदैवत म्हणजे नेमकं काय? कोणत्याही पूजेत ग्रामदेवता, इष्ट देवतेचं स्मरण का करतात

Last Updated:

Religious: पूजा करताना कुलदैवत, ग्रामदेवता आणि इष्ट देवता यांची पूजा केली जाते, गुरुजीदेखील या देवांचं स्मरण करायला लावतात, तर या देवतांमध्ये काय फरक आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये त्यांचं स्मरण का केलं जातं..

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात देवांना खूप महत्त्व आहे. घरात कोणतीही पूजा असेल किंवा शुभ कार्य असेल तेव्हा सर्वांत आधी देवांचं स्मरण केलं जातं. प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धतही वेगळी असते. हिंदूधर्मात कोट्यवधी देवी-देवतांची पूजा केली जाते. सर्व देवी-देवतांच्या पूजेची पद्धत आणि श्रद्धा वेगळी आहे. पण पूजा करताना कुलदैवत, ग्रामदेवता आणि इष्ट देवता यांची पूजा केली जाते, गुरुजीदेखील या देवांचं स्मरण करायला लावतात, तर या देवतांमध्ये काय फरक आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये त्यांचं स्मरण का केलं जातं ते जाणून घेऊ.
कुलदैवत -
कुटुंबाच्या म्हणजेच कुळाच्या देवाला कुलदैवत म्हणतात. पूर्वज आणि अनेक पिढ्या खूप काळापासून ज्यांची पूजा करत असतात, त्यांना कुलदैवत म्हणतात. त्याबरोबरच कुलदैवतामार्फत कुळातील लोक देवता संदेश देत असत किंवा पूजा देवापर्यंत पोहोचवत असत. घरातील कोणत्याही खास प्रसंगी कुलदैवताचं स्मरण करून त्यांच्या ठिकाणी जाऊन त्याची पूजा-अर्चना करून त्यांना आमंत्रित केलं जातं. प्रत्येक कुळात वेगवेगळे देवी-देवता असतात. याचबरोबर कुलदैवत किंवा कुलदेवी वंशाचे म्हणजे कुळाचे रक्षक मानले जातात.
advertisement
ग्रामदेवता -
प्रत्येक गावात एक देव असतो, ज्याची पूजा संपूर्ण गावातील लोक करतात. गाव आणि समाजाच्या रक्षणासाठी ग्रामदेवता असतात. त्याच्या पूजेत गावातील लोक सहभागी होतात. याच ग्रामदेवतांचा वार्षिक उत्सव उरूसही साजरा केला जातो. कुटुंबं पिढ्यानपिढ्या वाढत असूनही प्रत्येकजण ग्रामदैवताचीच पूजा करतात.
advertisement
इष्ट देवता -
हिंदू धर्मात 33 कोटी देवी-देवता आहेत. पण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा करते. इष्टचा अर्थ प्रिय असा होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आपला आवडता देव असतो, ज्याची ती पूजा करते. त्या देवतेला इष्ट देवता म्हणतात. इष्ट देवता नेहमी मार्गदर्शन करतात आणि रक्षणही करतात.
advertisement
पूजेत सर्वांत आधी केले जाते देवांचे स्मरण -
घरी किंवा कुठेही कोणतीही पूजा असेल तर सर्वांत आधी गणपतीचं आणि देवी-देवतांचे स्मरण केलं जातं. कारण देवी-देवतांची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. याचबरोबर कोणत्याही पूजेमध्ये गुरुजी लोकांना कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्ट देवता यांचे स्मरण करण्यास सांगतात. कारण कोणत्याही शुभकार्यात सर्व देवतांची पूजा आणि त्याचं स्मरण करणं आवश्यक असतं. या देवतांचं स्मरण करण्याचा अर्थ असतो की आपण पूजा करताना त्यांची आठवण करत आहोत. तसंच काही देवतांना आवाहन करून पूजेसाठी बोलवलंही जातं. त्याशिवाय पूजा संपन्न होत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Religious: कुलदैवत म्हणजे नेमकं काय? कोणत्याही पूजेत ग्रामदेवता, इष्ट देवतेचं स्मरण का करतात
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement