WT20 World Cup : पाकिस्तानला लोळवलं पण टीम इंडियाची सेमीफायनलची वाट बिकट; गणित जुळणार का?

Last Updated:

महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला भारताने नमवलं.

News18
News18
मुंबई : भारतीय महिला संघाने टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला ६ विकेटने हरवलं. या विजयानंतरही भारतीय संघासमोर सेमीफायनल गाठण्याचं आव्हान आहे. भारतीय संघाला पाकिस्तानचा पराभव मोठ्या धावसंख्येने करण्याची गरज होती पण ते शक्य झालं नाही. यामुळे आता भारताला उर्वरित सामन्यात जास्ती जास्त विजय मिळवावा लागेल. याशिवाय न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांचा मोठा पराभव होण्याची वाट बघावी लागेल. यामुळे रनरेटचं गणित सुटेल आणि भारताचं सेमीफायनलचं समीकरण जुळेल.
महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत सेमीफायनला पोहोचण्याची वाट आता रनरेटवर अवलंबून आहे. भारतीय महिला संघ टी२० वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ आहे. श्रीलंका वगळता इतर संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. यामुळे भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. या ग्रुपमधील टॉपचे दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
advertisement
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलने आतापर्यंत प्रत्येकी एकच सामना खेळला आहे. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. यात एक विजय आणि एक पराभव झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भक्कम स्थितीत आहेत. त्यापैकी एक संघ ८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तर इतर संघ जास्ती जास्त ६ पॉइंट मिळवू शकतात.
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला भारताने नमवलं. भारताला ६ गुण मिळवायचे असतील तर उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. भारताला आता ९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध, १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचं आहे. यात एका सामन्यात जरी पराभव झाला तरी भारतीय संघाला जर-तर च्या समीकरणावर अवलंबून रहावं लागेल.
advertisement
भारतीय संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला हरवलं तर ६ गुण होतील. मात्र न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाचे ६ पेक्षा जास्त गुण होण्याची शक्यताही आहे. अशा स्थितीत नेट रनरेटवर निर्णय होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना झाला. पाकिस्तानने भारतासमोर १०६ धावांच आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान १८.५ षटकात ५ विकेटच्या बदल्यात पूर्ण केलं. या विजयामुळे भारताला २ गुण मिळाले पण नेट रनरेट जास्त बदलला नाही. भारताने जर पाकिस्तानला ११ ते १२ षटकात हरवलं असतं तर रनरेट वाढला असता.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WT20 World Cup : पाकिस्तानला लोळवलं पण टीम इंडियाची सेमीफायनलची वाट बिकट; गणित जुळणार का?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement