अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घनदाट जंगलात नैसर्गिकरित्या उगवणारा रानआवळा भरपूर प्रमाणात आहे. आता तो रानआवळा केवळ जंगलातील फळ न राहता आरोग्यसंवर्धन आणि आदिवासी महिलांच्या रोजगाराचा मजबूत आधार ठरत आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप तसेच वातविकारांवर उपयुक्त ठरणाऱ्या रानआवळ्यापासून पहिल्यांदाच मेळघाटात च्यवनप्राश निर्मितीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी महिलांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे.



