आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय विधीमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनावर सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या कार्याला, वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, "अजित दादा म्हणायचे मी कधीतरी मुख्यमंत्री होईन, पण उपमुख्यमंत्री मा कायमच राहिल. एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता. तो अजित दादांच्या रुपाने आता नाही."



