राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक आयोगाने बिगुल वाजवले. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसच्या एका गटाने विरोध केल्याचे समोर आल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केले आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही.पण काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पण काँग्रेस अन् ठाकरेंची सेना यांच्यात कोण कुर्बाणी देणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे.



