बाहेर युरिया 3000 रुपयांना मिळत आहे. मात्र भारतात स्वस्त दरात खत दिलं जात आहे. हे युद्ध मानवतेच्या हिताचं नाही. बॉर्डर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, नौदलला तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षा अधिक वाढवण्यात आल्या आहेत.
हे युद्ध लवकर संपणार नाही. काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. युद्धाचे दीर्घकालीन परिणाम भोगवे लागू शकतात. त्यामुळे कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एकत्र येऊन लढल्यास सगळ्या संकटांना तोंड देता येईल.
शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठी घसरण, 2000 अंकांनी कोसळलं सेन्सेक्स मात्र त्याही ग्रीन एनर्जी, सोलार, सारखे शेअर्स सध्या चांगले परफॉर्म करत आहेत. दुसरीकडे चांदीला लोअर सर्किट लागलं आहे. डॉलर मजबूत झालं आहे.
विजेवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे डिझेल खरेदी करण्याचं प्रमाण कमी झालं. मेट्रोच्या जाळ्यामुळे देखील भारताला फायदा झाला. इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिला त्याचा फायदा भारताला झाला. भारताचं भविष्य अधिक सुरक्षित होईल असा पीएम मोदींनी विश्वास व्यक्त केला.
भारतात गॅस उत्पादन वाढवण्याला भर देत आहे. याआधी 70 देशांमधून गॅस आयात करत होतं आता 41 देशांमधून करत आहे. खतांसाठी देखील मोठा फटका बसला आहे. शक्य आहे तिथून गॅस आणि तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्यावर भर दिला आहे.
हार्मुज समुद्रधुनीमधून कच्च तेल आणि गॅस येत आहे. हार्मुजमधून येणं जाणं जास्त धोक्याचं झालं आहे. युद्धाचा फटका बसला आहे. देशात 60 टक्के LPG आयात केलं जातं. त्यामुळे प्राधान्य घरगुती गॅस सिलिंडरना देण्यात आलं आहे. तर देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे.
३ लाख 75 हजार भारतीय सुरक्षितरित्या भारतात आले. 700 हून अधिक मेडिकलचा अभ्यास करणारे आहेत. भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे.
युद्धाचा फटका सर्वसामान्य लोकांना सर्वाधिक बसला आहे. आखाती देशात 1 कोटी भारतीय काम करतात. युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मी स्वत: आखाती देशांमध्ये फोन करून याबाबत माहिती घेतली आहेत. आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना मदत केली जात आहे. दुर्देवानं काही भारतीय अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
तीन आठवड्यांपेक्षा जास्त संघर्ष सुरू, त्याचा परिणाम आता लोकांच्या आयुष्यावर होत आहे. भारतासमोरही या युद्धामुळे अप्रत्यक्ष आव्हानं समोर आणली आहेत. ही आव्हानं आर्थिक, नॅशनल सिक्युरिटी आणि इतरही आहेत. युद्धात अप्रत्यक्षरित्या होरपळत आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटममुळे बाजारात घबराट पसरली. निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी घसरून २२,६०० च्या जवळ पोहोचला. बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी सर्वाधिक दबाव टाकला. बँक निफ्टी १,६०० हून अधिक अंकांनी घसरला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप बाजारांमधील विक्रीमुळे बाजारात आणखी घसरण झाली.
शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश, चांदीच्या किंमती 2 लाख रुपयांहून कमी आल्या असून लोअर सर्किट लागला आहे. गुंतवणूकदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.



