Nepal Protest: अशांत नेपाळ! हिंदू कनेक्शन काय? भारताने हस्तक्षेप करावा; आंदोलनाची Inside Story
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Violent protests in Nepal: नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे उसळलेल्या हिंसक आंदोलनात 20 हून अधिकांचा बळी गेला आहे. भारतीय निवृत्त मेजर जनरल जी. डी. बख्शी यांनी या संकटाला ‘हिंदू कनेक्शन’शी जोडत भारताला सक्रिय हस्तक्षेपाचे आवाहन केले आहे.
काठमांडू: नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर सुरू असलेल्या निदर्शनांमुळे परिस्थिती अधिक चिघळत आहे. सोमवारी आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट संसदेत घुसून पंतप्रधान निवासावर दगडफेक केली. त्यानंतर लष्कराला गोळीबार करावा लागला, ज्यात 20 हून अधिक लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. नेपाळच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की, ‘यासाठी मला पद सोडावे लागले तरी चालेल, पण सोशल मीडियावरील बंदी हटवली जाणार नाही.’ ते याला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मानत आहेत.
advertisement
नेपाळमधील या घडामोडींवर भारतीय लष्कराचे निवृत्त मेजर जनरल जी. डी. बख्शी यांनी वेगळे मत मांडले आहे. त्यांनी या संकटाला हिंदू राष्ट्राच्या पुनर्वसन आणि नेपाळच्या अंतर्गत अस्थिरतेशी जोडले आहे. बख्शी यांनी या संकटाचे ‘हिंदू कनेक्शन’ काय आहे हे सांगितले आहे. तसेच त्यांनी भारताला या संकटात सक्रियपणे हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. कारण हे केवळ नेपाळशीच नाही, तर भारताच्या सुरक्षा आणि सांस्कृतिक हितांशीही जोडलेले आहे.
advertisement
नेपाळमधील हिंदूंना का त्रास होतोय?
मेजर जनरल जी. डी. बख्शी यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले आहे की- गेल्या अनेक वर्षांपासून हे स्पष्ट झाले आहे की नेपाळचे लोक सतत नाराज आणि निराश होत आहेत. के. पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट सरकारने भ्रष्टाचार आणि स्वार्थाचे अभूतपूर्व उदाहरण सादर केले आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष केवळ युतीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत नाही. माध्यमांमध्येही यावर प्रभाव टाकण्याची ताकद राहिलेली नाही.
advertisement
बख्शी म्हणाले की- नेपाळमधील लोक त्यांच्या हिंदू मुळांकडे परत येऊ इच्छित आहेत. अलीकडेच व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्याने ते अत्यंत त्रस्त झाले आहेत. हा केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा मुद्दा नाही. तर त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय कॉल करणेही कठीण झाले आहे. नेपाळमधील अनेक लोक दुबई, जपानसारख्या देशांतील आपल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोफत कॉलचा वापर करत होते. पण आता ही सुविधाही बंद झाली आहे.
advertisement
भारताने शांत राहू नये
मेजर जनरल जी. डी. बख्शी यांनी भारत सरकारला आवाहन केले आहे. ते म्हणाले- भारत एक लोकशाही देश आहे आणि नेपाळमधील नागरिकांच्या हत्याकांडावर किंवा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर तो शांत राहू शकत नाही. नेपाळमधील परिस्थिती वेगळी आहे. ही बांगलादेशसारखी स्थिती नाही, जिथे सरकार भारत-समर्थक होते. ओली यांचे कम्युनिस्ट सरकार हिंदू धर्माला कमकुवत करण्याचे धोरण अवलंबत आहे. म्हणून ओली यांना हटवणे आवश्यक आहे. आपण कोणत्याही कम्युनिस्ट, नास्तिक आणि हुकूमशहा शासकाच्या बाजूने उभे राहू शकत नाही; खासकरून एका हिंदू देशात. आपण नेपाळमधील सामान्य लोकांच्या सोबत उभे राहिले पाहिजे आणि त्यांच्या आवाजाला समर्थन दिले पाहिजे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 7:56 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Nepal Protest: अशांत नेपाळ! हिंदू कनेक्शन काय? भारताने हस्तक्षेप करावा; आंदोलनाची Inside Story