advertisement

१५ लाख पॅकेजची नोकरी सोडली, राहुलने गावी येऊन शेतीत जे कुणाला जमलं नाही ते केलं, आता करतोय १५ कोटींची कमाई

Last Updated:

Success Story : सध्याच्या काळात शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन झपाट्याने बदलत आहे. केवळ परंपरागत व्यवसाय म्हणून नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि बाजारपेठेची समज यांचा मेळ घालून अनेक तरुण शेतीत मोठे यश मिळवत आहेत.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : सध्याच्या काळात शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन झपाट्याने बदलत आहे. केवळ परंपरागत व्यवसाय म्हणून नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि बाजारपेठेची समज यांचा मेळ घालून अनेक तरुण शेतीत मोठे यश मिळवत आहेत. यामध्ये इंजिनिअर, एमबीए आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलेले सुशिक्षित युवक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा म्हणजे इंजिनिअर राहुल कुमार यांची, ज्यांनी १५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला आणि आज १.५ कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल उभी केली आहे.
दुःखातून निर्धाराकडे वाटचाल
राहुल कुमार हे छिंदवाडा जिल्ह्यातील खजरी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी बीटेक आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुमारे १५ वर्षे एका पॉवर प्लांटमध्ये काम केले. कॉर्पोरेट जीवनात स्थिरता असतानाही त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. वडील आणि लहान मुलाला कर्करोगासारख्या गंभीर आजारामुळे गमावल्याने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. या दुःखातून बाहेर पडताना त्यांनी आरोग्यदायी अन्न आणि रसायनमुक्त शेतीचे महत्त्व ओळखले. अखेर २०१८ मध्ये नोकरीचा राजीनामा देत त्यांनी सेंद्रिय शेतीचा ठाम निर्णय घेतला.
advertisement
सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अभ्यास
राहुल यांनी नैसर्गिक शेती प्रभावीपणे आत्मसात करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला. देशातील नामांकित संस्था, तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. जीवामृत, गांडूळखत, नीमास्त्र यांसारखी सेंद्रिय इनपुट्स स्वतः तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. यासोबतच इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीने संरक्षित शेती, ड्रिप इरिगेशन आणि मशरूम उत्पादनासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब केला.
advertisement
विविध पिके आणि मूल्यवर्धन
राहुल यांच्याकडे सुमारे १० एकर जमीन आहे. या जमिनीत गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, मूग तसेच विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. रसायनमुक्त पद्धतीमुळे उत्पादनाचा दर्जा आणि बाजारभाव दोन्ही वाढले आहेत. याशिवाय दूध उत्पादन आणि मशरूम शेतीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यांच्या शेतीतील सर्वात यशस्वी प्रयोगांपैकी एक म्हणजे “रसायनमुक्त नवरत्न पीठ”. ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, काळा गहू आदी पौष्टिक धान्यांचे मिश्रण असलेले हे पीठ त्यांच्या सेंद्रिय प्रक्रिया युनिटमध्ये तयार केले जाते. आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांमध्ये या उत्पादनाला मोठी मागणी आहे. या युनिटमुळे परिसरातील ५० हून अधिक लोकांना रोजगारही मिळाला आहे.
advertisement
कोट्यवधींची उलाढाल आणि शेतकऱ्यांसाठी आदर्श
पूर्वी १५ लाख रुपयांच्या पॅकेजवर काम करणारे राहुल आज शेतीतून १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल करत आहेत. त्यांची उत्पादने गुरुग्राम, नोएडा, पुणे यांसह देशातील विविध शहरांमध्ये पोहोचवली जात आहेत. त्यांनी स्थापन केलेला श्रीराम ऑरगॅनिक फार्मर्स ग्रुप आज ६०० हून अधिक शेतकऱ्यांना एकत्र आणतो. या माध्यमातून ते इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रेरणा देत असून, शेतीतूनही सन्मानजनक आणि शाश्वत उत्पन्न मिळू शकते, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
१५ लाख पॅकेजची नोकरी सोडली, राहुलने गावी येऊन शेतीत जे कुणाला जमलं नाही ते केलं, आता करतोय १५ कोटींची कमाई
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement