Soybean Purchase : खरेदी सुरू ठेवली नाहीतर कार्यालयात सोयाबीन ओतणार, शेतकऱ्यांचा नाफेड कार्यालयात गोंधळ

Last Updated:

Soybean Rate : सोयाबीन खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाफेडच्या कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी गदारोळ केला आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या. अन्यथा आम्ही सोयाबीन तुमच्या कार्यालयात सोयाबीन आणून टाकू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

News18
News18
धाराशिव : सोयाबीन खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाफेडच्या कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी गदारोळ केला आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या. अन्यथा आम्ही सोयाबीन तुमच्या कार्यालयात सोयाबीन आणून टाकू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सोयाबीन खरेदी आजपासून बंद
केंद्र सरकारने आजपासून सोयाबीन खरेदी बंद केली आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नाफेडच्या अधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात गदारोळ केला आहे.
सरकारचे धोरण चुकीचे
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ''सरकारचे धोरण चुकीचे आहे. सरकारने संपूर्ण सोयाबीन खरेदी करणे गरजेचे होते. पण तसं झाले नाही. 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन राज्यात झालेले आहे. त्यातून फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सरकारने शेतकऱ्यांचा संयम सुटण्याचा वाट पाहू नये. नाहीतर शेतकरी मुंबईत मोर्चा काढतील''. असा इशारा तुपकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
advertisement
दरम्यान, आता शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढ मिळाली नाही तर त्यांना कमी दराने खुल्या बाजारात आपले उत्पादन विकावे लागणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची जोरदार मागणी केली जात आहे. राज्याच्या पणन मंडळाने केंद्राकडे 13 तारखेपर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहावी यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Soybean Purchase : खरेदी सुरू ठेवली नाहीतर कार्यालयात सोयाबीन ओतणार, शेतकऱ्यांचा नाफेड कार्यालयात गोंधळ
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement