TRENDING:

पाऊस पुन्हा झोडपणार! नद्या, नाले ओसंडून वाहणार, या जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट

Last Updated:

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) 16 जुलैसाठी राज्यातील हवामानाचा नव्याने अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) 16 जुलैसाठी राज्यातील हवामानाचा नव्याने अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकण, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात वेगवेगळ्या प्रमाणात पावसाचा अनुभव येणार असून, समुद्रसपाटीपासून घाटमाथ्यांपर्यंत हवामानात मोठे बदल दिसून येतील. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि ढगाळ वातावरण यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसू शकतात.
agriculture news
agriculture news
advertisement

कोकण परिसरात वातावरण ढगाळ, पावसाच्या सरी

कोकण विभागात विशेषतः ठाणे, रायगड आणि पालघर या भागांमध्ये 16 जुलै रोजी ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार पाऊसही होऊ शकतो. समुद्र खवळलेला राहणार असून, लाटांची उंची सुमारे 0.6 मीटरपर्यंत जाऊ शकते. या भागातील मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

advertisement

पुणे आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाटमाथ्यांवर विशेषतः महाबळेश्वर, खंडाळा, मुळशी अशा ठिकाणी पावसाचा जोर अधिक असणार आहे. हवामान विभागाने पुण्यासह काही जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. शेतीकामांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

advertisement

विदर्भ आणि मराठवाडा

विदर्भातील नागपूर आणि अमरावती परिसरात मान्सून मध्यम स्वरूपाचा राहील. विशेष म्हणजे नागपूरमध्ये वार्षिक सरासरी सुमारे 1205 मिमी पाऊस पडतो, परंतु यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाची स्थिती थोडी सौम्य राहणार असून, काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अनुभव येईल. ढगाळ वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता काहीशी कमी होईल.

advertisement

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा

हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामात घाई करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. जून महिन्याच्या मध्यापासून मान्सून सक्रिय झाल्यामुळे जमिनीतील ओलावा वाढला असला, तरीही पावसाच्या सातत्याची खात्री झाल्याशिवाय शेतीची कामे सुरू न करणे योग्य ठरेल. योग्य नियोजन आणि हवामानाचा आढावा घेऊनच पुढील शेती कामांची आखणी करावी, असा इशारा देण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

दरम्यान, राज्यात 16 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, अनेक भागात पावसाचे प्रमाण सरासरीहून जास्त राहणार आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास व शेतीचे निर्णय घ्यावेत.

मराठी बातम्या/कृषी/
पाऊस पुन्हा झोडपणार! नद्या, नाले ओसंडून वाहणार, या जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल