आजचे बाजारभाव काय?
४ मार्च रोजी तुळजापूर बाजार समितीत सोयाबीनची १३० क्विंटल आवक झाली. विशेष म्हणजे येथे किमान, कमाल आणि सर्वसाधारण दर प्रत्येकी ५,३५० रुपये प्रति क्विंटल इतकाच नोंदवला गेला. दरात कोणताही फरक नसल्याने बाजार स्थिर असल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे अकोला बाजार समितीत ‘पिवळा’ सोयाबीनची 844 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. येथे किमान दर ४,९०० रुपये, कमाल दर ५,२४० रुपये, तर सर्वसाधारण दर ५,१५० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. मोठ्या प्रमाणात माल बाजारात दाखल होऊनही सरासरी दर ५ हजारांच्या पुढे राहिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
advertisement
३ मार्च रोजी राहुरी बाजार समितीत ‘लोकल’ सोयाबीनची केवळ 7 क्विंटल आवक झाली. कमी आवक असल्याने येथे दर ५,३०० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला. किमान, कमाल आणि सर्वसाधारण दर समान असल्याने व्यवहार मर्यादित प्रमाणात झाले.
राहुरी बाजार समितीमध्ये दर स्थिर
दरम्यान, बुलढाणा-धड बाजार समितीत ‘पिवळा’ सोयाबीनची 254 क्विंटल आवक झाली. येथे किमान दर ४,४०० रुपये, कमाल दर ५,३०० रुपये, तर सर्वसाधारण दर ५,००० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. किमान आणि कमाल दरातील फरक पाहता गुणवत्तेनुसार दर ठरत असल्याचे दिसून आले.
एकूणच राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर ५,००० ते ५,३५० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. काही ठिकाणी आवक वाढल्याने किमान दरात घट झाली असली तरी चांगल्या प्रतीच्या मालाला अजूनही ५,२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
