जून महिन्यात सरी काढून रताळी काडीची लागवड केली. पावसामुळे चार महिने पाणी देण्याची गरज पडत नाही. यानंतर युरिया आणि इतर खतांच्या मात्रा देण्यात आल्या. या पिकावर आलेल्या रोग नियंत्रणासाठी दोन फवारण्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री असल्याने सध्या रताळी काढण्याचे काम सुरू आहे, असे ज्ञानेश्वर सांगतात.
Agriculture News : कमी खर्चात करा एरंडी शेती, मिळेल पैसाच पैसा, कशी कराल लागवड? Video
advertisement
दीड एकर रताळे शेतीतून 150 क्विंटल उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. याला 15 रुपये प्रति किलो पर्यंत दर मिळतो. दीड एकरात तीन लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे खांडेभराड यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांनी देखील रताळ्यांची शेती केल्यास ती फायदेशीर ठरेल असंही ते सांगतात.
दरम्यान, पारंपरिक पिकांपेक्षा या पिकाला खर्च कमी असून उत्पादन देखील चांगले मिळते. विशेष म्हणजे शेतावरूनच व्यापारी या रताळ्याची खरेदी करतात. यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. या रताळ्याची मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये विक्री केली जाते. व्यापारी हा माल इतर शहरात पाठवतात.





