TRENDING:

गुड न्यूज! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १८७ कोटींची नुकसान भरपाई आली, हेक्टरी किती पैसे मिळणार?

Last Updated:

Agriculture News : गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव : गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली होती. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान, शेतजमीन वाहून जाणे आणि आर्थिक अडचणीत सापडलेले हजारो शेतकरी अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘रब्बी’ हंगाम सावरण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून, त्याचा प्रत्यक्ष लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू लागला आहे.
agriculture news
agriculture news
advertisement

अतिवृष्टीमुळे शेतीवर मोठा आघात

गतवर्षीच्या मुसळधार पावसाने आणि पूरस्थितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेतातील माती खरडून गेली, तर काही भागांत उभे पीक अक्षरशः वाहून गेले. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रब्बी हंगामात तरी काही उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी धरली होती. मात्र आर्थिक संकटामुळे बियाणे, खते आणि मशागतीसाठी निधी उभारणे कठीण झाले होते.

advertisement

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि त्यांची शेती पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत करणे.

advertisement

२७० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन मित्रांनी ठरवलं! बिझनेस आयडियाने सगळ्यांचं मन जिंकलं, मुंबईतच नाही तर परराज्
सर्व पहा

या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५५ हजार ४८७ शेतकऱ्यांसाठी २७० कोटी ९२ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी १५ जानेवारीअखेरीस २ लाख ७१ हजार २७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट १८७ कोटी ४३ लाख ८ हजार ७४३ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
गुड न्यूज! या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १८७ कोटींची नुकसान भरपाई आली, हेक्टरी किती पैसे मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल