पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांच्या आसपासच्या परिसरात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. परंतु, जालना सारख्या निमशहरी परिसरात ही संकल्पना यशस्वी होईल की नाही याबाबत साशंकता असलेल्या नंदापूरच्या ज्ञानेश्वर उबाळे यांनी योग्य नियोजन, मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर कृषी पर्यटनाच्या व्यवसायात जम बसवला आहे.
Success Story : नोकरी सोडली, चहा विकला, आता निलेश बनला रेस्टॉरंटचा मालक, वर्षाला 80 लाखांची उलाढाल
advertisement
12 जानेवारी 2024 मध्ये उबाळे यांनी नंदापूर गावात या 2 एकरात पर्यटन केंद्राची सुरुवात केली. अल्पावधीतच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या. त्यांच्या बोटींग, झीप रायडींग, स्काय सायकल, उंट सफारी, घोडी सफारी, ट्रेन सफारी, मॅजिक शो, स्विमिंग पूल, रेन डान्स इत्यादी प्रकारचे खेळ तर खाद्य महोत्सवात मराठवाडा स्पेशल हुरडा पार्टी, थालीपीठ, दहीधपाटे, मिसळ पाव, गावरान मेव्यात बोरं, पपई, मोसंबी, पेरू, मका इत्यादी रानमेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आहारावर भाजलेल्या डाळ बाटी जेवणात दिली जाते.
या व्यवसायात सुरुवातीला असंख्य अडचणी आल्या. सुरू करण्याआधी आम्ही पुणे भागात जाऊन आलो. अडचणींवर मात करत हे कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले. सध्या शालेय सहल आणि फॅमिली ट्रिपसाठी सर्वाधिक लोक येत आहेत. लोकांच्या सेवेत 12 पुरुष आणि 8 महिला अशी एकूण 20 लोकांची टीम असल्याचे उबाळे यांनी सांगितले.





