व्हॅलेंटाईन वीकमध्ये शेतकऱ्यांचा सुपर फंडा! फक्त ५० पैसे खर्च करून विकताय लाखोंचा गुलाब, नेमकं करताय काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik News : दिंडोरी, निफाड आणि नाशिक परिसरातील गुलाब शेती सध्या पूर्ण बहरात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतात पहाटे कापणीला सुरुवात होते आणि दुपारपर्यंत गुलाबांचे गठ्ठे तयार करून ते बाजारपेठेकडे रवाना केले जातात.
नाशिक : दिंडोरी, निफाड आणि नाशिक परिसरातील गुलाब शेती सध्या पूर्ण बहरात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतात पहाटे कापणीला सुरुवात होते आणि दुपारपर्यंत गुलाबांचे गठ्ठे तयार करून ते बाजारपेठेकडे रवाना केले जातात. कारण व्हॅलेंटाईन डे जवळ येत असताना प्रत्येक तास महत्त्वाचा ठरतो. वेळेत माल पोहोचला तरच चांगला दर मिळतो, हे शेतकऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे.
advertisement
५० लाख गुलाब उत्तर भारताकडे रवाना - यंदा दिंडोरी आणि निफाड पट्ट्यातून सुमारे ५० लाख गुलाब दिल्ली, कोलकाता आणि इतर उत्तर भारतीय शहरांकडे पाठवण्यात आले आहेत. लाल गुलाबांना सर्वाधिक मागणी असली तरी गुलाबी, पिवळे आणि पांढरे गुलाबही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यात फुलबाजारात दर चांगले मिळत असल्याने शेतकरीही या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात.
advertisement
advertisement
advertisement
१० कोटींच्या उलाढालीची शक्यता - ५० लाख गुलाबांची विक्री झाली तर अंदाजे १० कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. त्यातील एकूण वाहतूक खर्च साधारण २५ लाखांच्या आसपास राहतो. उर्वरित रक्कमेतून उत्पादन खर्च वजा केला तरी शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हा हंगाम वर्षातील महत्त्वाचा आर्थिक आधार ठरतो.
advertisement
रेल्वेमुळे दूरच्या बाजारपेठा खुल्या - पूर्वी दूरच्या बाजारात माल पाठवताना वेळ आणि खर्च ही मोठी अडचण होती. आता रेल्वे वाहतुकीमुळे दिल्ली, कोलकाता यांसारख्या शहरांत गुलाब मोठ्या प्रमाणावर आणि तुलनेने कमी खर्चात पोहोचत आहेत. वेळेत माल पोहोचल्याने ताजेपणा टिकून राहतो आणि व्यापाऱ्यांनाही नियोजन सुलभ होते. फुलांच्या बाजारात ताजेपणा हा दर ठरवणारा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे वेळेवर पोहोचणाऱ्या गुलाबांना चांगला भाव मिळतो.
advertisement







