Weather Alert : विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
30 मार्च रोजी विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
advertisement
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. मुंबईत कमाल तापमान 31 अंश ते किमान तापमान 26 अंश सेल्शिअस राहील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
30 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement









