महेश राठोड यांनी यावर्षी प्रथमच पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांनी शेणखत, जीवामृत आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर केला. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत झाली तसेच पिकाची गुणवत्ता सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनातही समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले. यासाठी त्यांना 25 हजार खर्च आला.
advertisement
आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video
त्यांच्या मते, सेंद्रिय शेतीमुळे सुरुवातीला काही अडचणी येतात, परंतु दीर्घकालीन फायदा नक्की मिळतो. खर्चात लक्षणीय घट झाल्याने निव्वळ नफा वाढला आहे. रासायनिक औषधांवर होणारा खर्च वाचल्यामुळे आर्थिक ताणही कमी झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती हा भविष्यासाठी उत्तम पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावर्षी कांद्याला बाजारात चांगला दर मिळाल्याने महेश राठोड यांना अपेक्षेपेक्षा अधिक नफा झाला. उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे व्यापाऱ्यांकडूनही चांगली मागणी मिळाली. यामुळे त्यांच्या मेहनतीचे चीज झाले असून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, महेश राठोड यांनी इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. शेतीमध्ये जर आपण योग्य नियोजन आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर केला, तर निश्चितच त्याचा फायदा होतो, असे ते सांगतात. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरात सेंद्रिय शेतीकडे वळण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.





