पैठणच्या दादेगाव हजारे शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबल्याने शेतातील सर्व डाळिंबाची पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 23 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेताला नदीचे स्वरूप मिळाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापसाचे बोंडे अक्षरशः काळे पडले असून मोसंबी, डाळिंब फळबाग देखील पाण्यात गेल्या असून या फळबागांचा लावलेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
advertisement
छंद असावा तर असा! नोकरी करत केले जुन्या शिवकालीन शस्त्रांचे जतन, ऐतिहासिक ठेव्याचा Video
मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे चांगतपुरी गावातील मुख्य बाजारपेठ आणि परिसरातील 20 ते 25 घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य आणि दुकानांतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 10 ते 12 तासांनी पाणी ओसरले.





