दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील प्रत्येक शेतकऱ्याने रताळी शेती केली आहे. सध्या नांगराच्या सहाय्याने रताळी शेताबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. गावात मजूर मिळत नसल्याने आसपासच्या परिसरातील महिला 300 रुपये रोज याप्रमाणे कामाला येतात, असे गावकरी सांगतात.
दमट हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
यंदा उत्पादनाला फटका
advertisement
यंदा पावसाळा जास्त झाला त्यामुळे किड रोग अधिक प्रमाणात आले. खत औषधी यांवर अधिकचा खर्च झाला. मधल्या काळात धुके देखील होते. यामुळे रताळी पाहिजे तशी वाढली नाहीत. महाशिवरात्री देखील यंदा जरा लवकर आली आहे. या सगळ्यांचा उत्पादनावर परिणाम झाला आहे, असंही गावकऱ्यांनी सांगितलं.
सध्या रताळ्याचे बाजार निघाले नाहीत. परंतु, 12 ते 15 रू प्रति किलो असे दर मिळतील अशी अपेक्षा आहे. दरवर्षी एकरी 150 क्विंटल उत्पादन मिळते. यंदा हेच 100 ते 120 क्विंटल पर्यंत मिळेल. तरीही 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होईल, अशी अपेक्षा गावचे पोलिस पाटील राजेश टाकळकर यांनी व्यक्त केली.





