तज्ज्ञांच्या मते, फुलोऱ्यानंतरच्या काळात झाडांवर ताण निर्माण झाला तर लहान फळे टिकत नाहीत. दिवस-रात्र तापमानातील तीव्र चढउतार, उष्ण व कोरडे वारे, तसेच आर्द्रतेतील अचानक बदल यामुळे फळांच्या देठांमध्ये कमकुवतपणा येतो. याशिवाय नत्र, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची कमतरता असल्यास फळधारणा कमी होते. काही ठिकाणी कीड-रोगांचा प्रादुर्भाव, विशेषतः हॉपर्स आणि अँथ्रॅक्नोज, यामुळेही फळगळ वाढू शकते. त्यामुळे फळगळ ही केवळ एक लक्षणीय समस्या नसून विविध घटकांचा एकत्रित परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
advertisement
Success Story : मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख निव्वळ नफा
फळगळ नियंत्रणासाठी योग्य सिंचन आणि पोषण व्यवस्थापन अत्यावश्यक ठरते. मातीतील आर्द्रता संतुलित राखण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे, तसेच फुलोऱ्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे फायदेशीर ठरते. झाडांना आवश्यकतेनुसार वाढ नियंत्रक (पीजीआर) वापरणे, कीड-रोगांवर प्रतिबंधात्मक फवारण्या करणे आणि झाडांच्या आरोग्याकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे. बागांमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास मातीची सुपीकता सुधारते आणि झाडांची सहनशक्ती वाढते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
फळगळ टाळण्यासाठी पाच प्रभावी उपाय?
संतुलित सिंचन - फुलोऱ्यानंतर पाण्याचा ताण टाळावा; ठिबक सिंचनाद्वारे नियमित आर्द्रता राखावी. सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी - बोरॉन, झिंक यांसारख्या घटकांची शिफारशीनुसार फवारणी करावी. वाढ नियंत्रकांचा वापर - तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य PGR वापरल्यास फळ टिकाव वाढतो. कीड-रोग नियंत्रण - हॉपर्स, अँथ्रॅक्नोज आदींवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करावेत. सेंद्रिय खतांचा समावेश - कंपोस्ट, शेणखत वापरून मातीचे आरोग्य सुधारावे.





