advertisement

Agriculture News : आंब्याची होतीये फळगळ, टाळण्यासाठी करा हे 5 प्रभावी उपाय, होईल फायदा

Last Updated:

फळे गळल्याने अपेक्षित उत्पादन घटते, दर्जावर परिणाम होतो आणि थेट आर्थिक नुकसान सहन करावे लागते. बदलते हवामान, अनियमित तापमान, पोषणतत्त्वांची कमतरता आणि पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन ही फळगळ वाढण्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

+
आंबा

आंबा उत्पादकांपुढे फळगळचे संकट; उत्पादन वाचवण्यासाठी काय कराल?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात आंबा हे अनेक शेतकऱ्यांसाठी प्रमुख नगदी पीक बनले आहे. दरवर्षी फुलोऱ्यानंतर बागांमध्ये लहान फळांची वाढ सुरू होताच मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. फळे गळल्याने अपेक्षित उत्पादन घटते, दर्जावर परिणाम होतो आणि थेट आर्थिक नुकसान सहन करावे लागते. बदलते हवामान, अनियमित तापमान, पोषणतत्त्वांची कमतरता आणि पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन ही फळगळ वाढण्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी वेळीच नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, फुलोऱ्यानंतरच्या काळात झाडांवर ताण निर्माण झाला तर लहान फळे टिकत नाहीत. दिवस-रात्र तापमानातील तीव्र चढउतार, उष्ण व कोरडे वारे, तसेच आर्द्रतेतील अचानक बदल यामुळे फळांच्या देठांमध्ये कमकुवतपणा येतो. याशिवाय नत्र, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची कमतरता असल्यास फळधारणा कमी होते. काही ठिकाणी कीड-रोगांचा प्रादुर्भाव, विशेषतः हॉपर्स आणि अँथ्रॅक्नोज, यामुळेही फळगळ वाढू शकते. त्यामुळे फळगळ ही केवळ एक लक्षणीय समस्या नसून विविध घटकांचा एकत्रित परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
advertisement
फळगळ नियंत्रणासाठी योग्य सिंचन आणि पोषण व्यवस्थापन अत्यावश्यक ठरते. मातीतील आर्द्रता संतुलित राखण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे, तसेच फुलोऱ्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे फायदेशीर ठरते. झाडांना आवश्यकतेनुसार वाढ नियंत्रक (पीजीआर) वापरणे, कीड-रोगांवर प्रतिबंधात्मक फवारण्या करणे आणि झाडांच्या आरोग्याकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे. बागांमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास मातीची सुपीकता सुधारते आणि झाडांची सहनशक्ती वाढते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
advertisement
फळगळ टाळण्यासाठी पाच प्रभावी उपाय?
संतुलित सिंचन - फुलोऱ्यानंतर पाण्याचा ताण टाळावा; ठिबक सिंचनाद्वारे नियमित आर्द्रता राखावी. सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी - बोरॉन, झिंक यांसारख्या घटकांची शिफारशीनुसार फवारणी करावी. वाढ नियंत्रकांचा वापर - तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य PGR वापरल्यास फळ टिकाव वाढतो. कीड-रोग नियंत्रण - हॉपर्स, अँथ्रॅक्नोज आदींवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करावेत. सेंद्रिय खतांचा समावेश - कंपोस्ट, शेणखत वापरून मातीचे आरोग्य सुधारावे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : आंब्याची होतीये फळगळ, टाळण्यासाठी करा हे 5 प्रभावी उपाय, होईल फायदा
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement